दहावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या संभाव्य तारीख

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, ५ मे २०२५ रोजी बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण उत्तीर्णतेचा टक्का ९१.८८% लागला असून, कोकण विभागाने पुन्हा एकदा सर्वोत्तम निकालाची नोंद केली आहे. बारावीचा निकाल(results) लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे वळले आहे.

यंदा बारावीप्रमाणेच दहावीची परीक्षा देखील वेळेपूर्वी म्हणजेच २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान पार पडली होती. उत्तरपत्रिका तपासणीचं काम नियोजित वेळेत पूर्ण झालं असून सध्या उत्तरपत्रिकांतील गुण आणि गुणपत्रिकेतील नोंदी याची अंतिम पडताळणी सुरू आहे. त्यामुळेच दहावीचा निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल(results) १५ ते २० मे २०२५ दरम्यान कधीही जाहीर होऊ शकतो. मात्र, मंडळाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अधिकृत घोषणेसाठी मंडळाच्या संकेतस्थळाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तो mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि इतर अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तयार राहणे गरजेचे असते, तसंच दहावीचा निकालही अनेक शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आहे.

यंदाच्या बारावी परीक्षेसाठी राज्यभरातून १४.८५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १४.१७ लाखांनी परीक्षा दिली आणि १३.०२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९४.५८% असून, मुलांचा टक्का ८९.५१% आहे. विभागीय निकालात कोकण विभाग सर्वाधिक ९६.७४% उत्तीर्णतेसह अव्वल ठरला, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६% लागला आहे.

निकालाची टक्केवारी मागील वर्षाच्या तुलनेत किंचित घटलेली असली तरी एकंदर निकाल समाधानकारक असल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे. दहावीच्या निकालाची वाट पाहत असलेले विद्यार्थी आणि पालकांसाठी येत्या आठवड्यात निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा :

“मी पुन्हा तीन वेळा गर्भवती राहीन, पण…”, शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचं वक्तव्य चर्चेत!

1500 चे 2100 रुपये होऊ शकत नाहीत, ‘लाडकी बहिण’ योजनेवर बड्या मंत्र्याची थेट कबुली!

सांगलीत खळबळ! आई – बहिणीने तरुणाला संपवलं, नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न