भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर (tensions)मुंबई आणि पुणे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईवर समुद्रामार्गे हल्ल्याचा धोका असल्याने भारतीय नौदलाने किनारपट्टीवरील मच्छिमारांसोबत तातडीची बैठक घेतली असून, त्यांना महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.मुंबईसह अनेक शहरांवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. 26/11 हल्ल्यासारखा मासेमारी नौकांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता भारतीय नौदलाने सतर्कता वाढवली आहे. प्रतिबंधित सागरी क्षेत्रात प्रवेश करू नये, अशा सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्व मासेमारी नौकांचे डिजिटल सर्वेक्षण लवकरच करण्यात येणार आहे.

मुंबई किनारपट्टीवर अतिरिक्त सुरक्षारक्षक, नौदलाचे गस्तीदल आणि महाराष्ट्र मरीन पोलिस यांची तैनाती वाढवण्यात आली आहे. नौकांचा गैरवापर टाळण्यासाठी नौदलाने शक्य तितक्या नौका जप्त करण्याच्या तयारीचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे(tensions) आवाहन करण्यात आले आहे.पुण्यातील एनडीए, पुणे विमानतळ, हवाई तळ, तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या ठिकाणी सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त ताफ्यांची तैनाती सुरु असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये (tensions)झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सूडाचा प्रयत्न सुरू असून, भारतातील प्रमुख शहरांना लक्ष्य केले जात आहे.
हेही वाचा :
हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
दोन पक्षातील फुट भाजपच्या पथ्यावर पडणार; महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्य
मैत्रिणीनेच केला घात! ड्रग्ज देऊन मित्रांच्या हवाली केले, महिनाभर सामूहिक बलात्कार