जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(Terrorist attack) भारत सरकारने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा जीव गेला असून, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून शस्त्रसंधी करार रद्द करण्याचा विचार सुरू असून, हे पाऊल थेट युद्धाच्या दिशेने जाणारे ठरू शकते.

काही मीडिया रिपोर्टनुसार, भारत सरकार शस्त्रसंधी करार रद्द करण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानने अनेकदा नियंत्रण रेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दहशतवादी गट जसे की लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्याकडून काश्मीरमध्ये सतत घुसखोरी होत असल्याने सरकारने आता निर्णायक कारवाईचा विचार सुरू केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट इशारा दिला आहे की, पहलगाम हल्ल्याच्या(Terrorist attack) सूत्रधारांना कुठेही लपले असले तरी भारत त्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल. याआधीच भारताने सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला धक्का दिला आहे. आता शस्त्रसंधी हटवून थेट लष्करी कारवाईची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले जात आहेत.
गुरुवारी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री यांनी पहलगाम हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर चर्चा करताना विरोधकांनीही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एकात्मता दर्शवली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले की, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांना विरोधकांचा पाठिंबा असेल.

दरम्यान, शस्त्रसंधी करार रद्द झाल्यास नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य अधिक सक्रिय होणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या लष्करावर दबाव वाढेल. तिन्ही सैन्यदलांना आधीच सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर पाकिस्तानकडून संभाव्य सर्जिकल स्ट्राईकची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नव्या टोकाकडे झुकताना दिसत आहेत. राजनैतिक संबंध आधीच ताणले गेले असून, व्यापार, पाणी, व्हिसा, आणि आता शस्त्रसंधी अशा साऱ्या पातळ्यांवर भारत निर्णायक पावलं उचलत आहे. हे सर्व निर्णय पाहता भारत आता पाकिस्तानशी प्रत्येक स्तरावर दोन हात करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा :
नवरीनं खाल्ला रसगुल्ला, हात धुण्याच्या बहाणा करून गेली प्रियकरासोबत पळून
फक्त तहान लागणे एवढंच नाही, Dehydration ची आणखी काही लक्षणे
एका नवऱ्यासाठी दोन बायकांची भांडणं! झिंज्या धरल्या, ओढत नेलं; व्हिडिओ व्हायरल