बिहार: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात लग्नाच्याच(marriage) दिवशी नवरी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आहे. लग्नाचे विधी सुरू असताना रसगुल्ला खाण्याच्या आणि हात धुण्याच्या बहाण्याने नेहा तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. नेहाला लग्नमंडपात बोलावलं जात होतं. पण तेव्हाच कुटुंबाला हे कळलं की नेहा तिच्या खोलीत नव्हती. ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते संतापले. रागाच्या भरात लग्नमंडपातून निघून गेले.

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील एका लग्नसोहळ्यात(marriage) चांगलाच गोंधळ उडाला. जेव्हा वधू वरमालानंतर रसगुल्ला खाऊन हात धुण्याच्या निमित्ताने गेली आणि थेट आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. ही घटना असरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सति स्थान गावात घडली. नेहा कुमारी ऊर्फ नंदनी (वय 21) ही अरुण मंडल यांची मुलगी आहे. तिचे लग्न संग्रामपूर प्रखंडातील बैजनाथपूर गावातील अमरजीत कुमार याच्याशी ठरले होते. नवरीचे कुटुंब दिल्लीमध्ये वास्तव्यास आहे. ते मजुरी करून आपली उपजीविका चालवतात. या लग्नासाठी त्यांनी अडीच लाख रुपये हुंडाही दिला होता. 23 एप्रिल 2025 रोजी विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता.
लग्नाचे(marriage) विधी सुरू होते, वरमाला विधीनंतर नवरी नेहा हळूच म्हणाली, “मला भूक लागली आहे, दोन रसगुल्ले आण”. तिच्या भावाने तिला रसगुल्ले आणून दिले, आणि ती हात धुण्याच्या बहाण्याने तेथून निघून गेली. मात्र, नंतर जेव्हा तिला मंडपात बोलावलं, तेव्हा ती गायब होती. ही बाब लक्षात येताच वरपक्ष संतापला. वधूच्या कुटुंबाने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची विनंती केली, पण वरपक्षाने स्पष्ट नकार दिला आणि ते लग्न मोडून घरी परतले. नेहा आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कुटुंबीयांनी असरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे गावात चर्चेचा विषय बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांंडवात लग्नाची मिरवणूक आली, वरमाला झाली पण हा विधी संपताच, रसगुल्ला खाण्याच्या आणि हात धुण्याच्या बहाण्याने नेहा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. नेहाला पुढच्या विधीसाठी बोलावले जात असताना नेहा तिच्या खोलीत नव्हती, याची माहिती कुटुंबाला मिळाली. जेव्हा वराला आणि लग्नाच्या कुटुंबाला याबाबत समजले की मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे, तेव्हा ते संतापले. नेहाचे वडील अजय मंडल म्हणाले, ‘आम्हाला चार मुली आणि दोन मुले आहेत. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासह दिल्लीत राहतो आणि मी मजूर म्हणून काम करतो. आम्ही आमची मोठी मुलगी नेहा हिचे लग्न गेल्या वर्षी संग्रामपूर ब्लॉकमधील बैजनाथपूर गावातील कपिलदेव मंडल यांचा मुलगा अमरजीत कुमार याच्याशी निश्चित केले होते.
लग्नासाठी अडीच लाख रुपये हुंडा म्हणून देण्यात आला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये छठपूजेच्या वेळी नेहाच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती, परंतु मुलाच्या कुटुंबाने काही कारणास्तव नकार दिला. त्यानंतर लग्नाची तारीख 23 एप्रिल 2024 निश्चित करण्यात आली. आता बुधवारी लग्नाची मिरवणूक आमच्या घरी आली आणि आम्ही त्यांचे स्वागत केले. लग्नातील पाहुण्यांना जेवण्यासाठी मासे आणि भाताची व्यवस्था करण्यात आली होती. पण वरमाला विधीनंतर माझी मुलगी तिच्या खोलीत गेली तेव्हा काही वेळाने तिला लग्नाच्या मंडपात बोलावण्यात आले. पण ती खोलीत नव्हती. आम्ही तिचा शोध घेतला तेव्हा आम्हाला कळले की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.

नेहाची बहीण गुडिया कुमारी आणि भाऊ अभिषेक यांनी सांगितले की, जेव्हा नेहाचे लग्न ठरले तेव्हा ती लहान बहिणीसोबत गावात राहत होती. आम्ही माझ्या बहिणीच्या लग्नासाठी दिल्लीहून आलो होतो. लग्नात हार बदलल्यानंतर ती म्हणाली, मला भूक लागली आहे, माझ्यासाठी दोन रसगुल्ला आणा. मी तिला रसगुल्ला आणला. तिने तो खाल्ला, मग ती हात धुवायला गेली. पण काही वेळाने जेव्हा ते तिला कन्यादानासाठी बोलावायला गेले, तेव्हा ती तिच्या खोलीत नव्हती. कुटुंबाने नेहा घरातून पळून गेल्याची तक्रार असरगंज पोलिस ठाण्यात दिली आहे आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा :
फक्त तहान लागणे एवढंच नाही, Dehydration ची आणखी काही लक्षणे
पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील बैठकीत मोठा निर्णय?; भारतीय सैन्य दलाला सतर्कतेचा इशारा
‘हे पाहून मला मुस्लीम असल्याची लाज वाटते…’; पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड गायक संतापला