जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम(Army) येथे लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू झाले असून, भारतीय सैन्य दलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रत्यक्षदर्शी पर्यटकांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी धर्म विचारून लोकांना लक्ष्य केले, ज्यामुळे हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या क्रूर हल्ल्यात, सहा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या तरुणाला त्याच्या पत्नीसमोरच गोळ्या घालण्यात आल्या. दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांदेखत पुरुषांवर गोळीबार केला. हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. अनेक पर्यटक अजूनही पहलगाममध्ये अडकले आहेत.

या हल्ल्याची तीव्रता लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला विदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. भारतात दाखल होताच पंतप्रधानांनी विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.(Army) या हल्ल्यातील पीडित देशाच्या विविध भागांतील रहिवासी आहेत, ज्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.
या हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. संरक्षण मंत्रालयात सुमारे तीन तास एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत हल्ल्याला प्रत्युत्तर कसे द्यावे ‘बदला कसा घेता येईल’ यावर सखोल चर्चा झाली. काही संभाव्य पर्यायांवर विचार करण्यात आला असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत सादर केले जातील.
आज बुधवार, २३ एप्रिल २०२५ संध्याकाळी ६ वाजता(Army) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नियोजित आहे. गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरहून दिल्लीत परत येऊन या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकांनंतर भारतीय सैन्य दलांना ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्य दल सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. पर्यटकांना लक्ष्य केल्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
‘तारक मेहता’मधील अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या
अक्षय्य तृतीयेपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा; सोन्याच्या दरवाढीत ब्रेक
IPL 2025 मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा फुल सपोर्ट
गुजरातचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, मुंबईचं पुनरागमन, चेन्नई बाहेर
श्रेयस अय्यरने धडाकेबाज कामगिरीने करुन दाखवलं, BCCI ने आधी वगळलं