रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 10 मे रोजी डबल हेडरमधील (points) दुसऱ्या सामन्यात मुंबईवर मात करत 2 गुण मिळवले. आरसीबीचा हा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सातवा विजय ठरला. तिलक वर्मा याने केलेल्या 57 धावांच्या जोरावर मुंबईने आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कृणाल पंड्या याने केलेल्या 73 धावांच्या मदतीने आरसीबीने 2 विकेट्सने सामना जिंकला. आरसीबीला शेवटच्या चेंडूवर विजयसाठी 2 धावांची गरज होती. त्यामुळे आरसीबी जिंकणार की मुंबई मैदान मारणार? याची उत्सूकता चाहत्यांना होती. तसेच 1 धाव झाली तर सुपर ओव्हरची शक्यता होती. त्यामुळे जिंकणार कोण? याची उत्सूकता शिगेला पोहचली होती. मात्र रसीख सलाम डार याने भुवनेश्वर कुमार याच्या मदतीने शेवटच्या चेंडूवर 2 धावा करुन आरसीबीला विजयी केलं.

आरसीबीने 1 चेंडूत 2 धावा करत 2 पॉइंट्सची कमाई केली. (points)आरसीबीचा हा एकूण सातवा तर मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला. आरसीबीला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने मुंबईवर मात करुन पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांची झेप घेतली. आरसीबी यासह पॉइट्स टेबलमध्ये नंबर 1 टीम ठरली आहे. तर मुंबई इंडियन्सचं पराभवासह प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं. मुंबई प्लेऑफमधून बाहेर होणारी दुसरी टीम ठरली. त्याआधी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नईने लखनौला पराभूत केलं. लखनौचं यासह पॅकअप झालं.
आरसीबीने मुंबईला पराभूत करुन सनरायजर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स (points)आणि पंजाब किंग्स या 3 संघांना मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं. आरसीबी या सामन्याआधी चौथ्या स्थानी होती. मात्र एका विजयासह आरसीबी नंबर 1 ठरली. आरसीबी व्यतिरिक्त हैदराबाद आणि गुजरातचेही 14 गुण आहेत. मात्र आरसीबीचा नेट रनरेट सरस असल्याने त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवला. या वरुन नेट रनरेटचं महत्त्व स्पष्ट होतं.
दरम्यान सोमवारी 11 मे रोजी 19 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांची ही या मोसमातील आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. पंजाबने गेल्या सामन्यात दिल्लीला पराभूत केलं होतं. त्यामुळे दिल्ली पंजाब विरुद्ध विजय मिळवून गेल्या पराभवाचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.;
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?