प्रेमानंद महाराजांची प्रकृती बिघडली पदयात्रा आणि खाजगी दर्शन बंद

वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांची तब्येत अचानक बिघडली असून, त्यांची प्रकृती सध्या नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. वाढत्या आजारपणामुळे त्यांच्या रोजच्या दिनक्रमात मोठा बदल करण्यात आला असून, त्यांची मध्यरात्रीची पदयात्रा आणि भक्तांसाठीचे दर्शन पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. (Premanand Maharaj) यामुळे अनुयायांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे भक्तांची निराशा आणि आश्रमाचे आवाहन रविवारी रात्री नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हजारो भाविक पहाटे तीन वाजता महाराजांच्या दर्शनाची आस लावून बसले होते. मात्र, त्यांच्या ऐवजी केली कुंज आश्रमातील शिष्यांनी बाहेर येऊन ध्वनिक्षेपकावरून प्रकृती अस्वास्थ्याची माहिती दिली. संत प्रेमानंद महाराज हे तब्बल २१ वर्षांपासून मूत्रपिंडाच्या विकाराचा सामना करत आहेत. (Premanand Maharaj) डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्याने आजची यात्रा रद्द करत असल्याची घोषणा शिष्यांनी केली, तसेच रस्त्यावर गर्दी न करण्याची विनंतीही अनुयायांना केली.

दर्शन न झाल्याने बाराबंकी येथून आलेले राजू गुप्ता आणि कुटुंबासह आलेल्या पुष्पा गुप्ता यांच्यासारख्या अनेक भाविकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. महाराज लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी राधा राणीकडे केली. एरवी महाराज रोज पहाटे तीन वाजता केली कुंज येथून सौभरी वनापर्यंत दीड किलोमीटर पायी चालत जातात. या प्रवासात त्यांचे दर्शन घेण्यासाठी साधारणपणे वीस हजार, तर सुट्टीच्या दिवशी लाखो लोक उपस्थित असतात.

बालपणातील आध्यात्मिक ओढ आणि वृंदावनचा प्रवास उत्तर प्रदेशातीलकानपूर जिल्ह्यात नरवाल तालुक्यातील आखरी गावात जन्मलेल्या महाराजांचे मूळ नाव अनिरुद्ध कुमार पांडे असे होते. शंभू नारायण पांडे आणि रमा देवी यांच्या या तीन मुलांपैकी मधल्या मुलाला लहानपणापासूनच भक्तीची ओढ होती. आठवीपर्यंत शाळेत गेलेल्या अनिरुद्धने लहानपणी मित्रांच्या साथीने एका शिवमंदिराचा चौथरा बांधायचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला लोकांचा विरोध झाल्यावर उद्विग्न होऊन त्यांनी गृहत्याग केला.

घर सोडल्यानंतर वृंदावन गाठल्यावर त्यांनी सुरुवातीला बांके बिहारीजींचे रोज दर्शन घेण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांचा कल राधावल्लभ संप्रदायाकडे वाढू लागला. एकदा परिक्रमेदरम्यान त्यांना एका संतांकडून आणि नंतर एका मित्राकडून ‘श्री राधरसूदनिधी’ मधील एक श्लोक ऐकायला मिळाला. (Premanand Maharaj) त्याचा अर्थ विचारल्यावर, तो समजण्यासाठी राधावल्लभ पंथाची दीक्षा घेणे गरजेचे असल्याचे मित्राने सांगितल्यावर त्यांनी लगेचच या पंथाचा स्वीकार केला आणि ते खऱ्या अर्थाने राधावल्लभी संत म्हणून नावारूपास आले.

हेही वाचा

जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात

ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?