मुंबईसमोर वानखेडे स्टेडियममध्ये पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने आरसीबी विरूद्धच्या पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करावे लागणार असल्याचे संकेत दिले होते.

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर मुंबईला सलग 3 पराभवांचा सामना करावा लागला. तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. (captain) त्यामुळे आता पंजाब विरूद्धच्या सामन्यातून कॅप्टन हार्दिक पंड्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं स्पष्ट आहे. अशात पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी पलटणची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तिलक वर्मा मुंबईचा प्रमुख फलंदाज आहे. तिलक प्रामुख्याने तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी खेळतो. मात्र तिलकला या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. तिलकने आतापर्यंतच्या 4 सामन्यांत अनु्क्रमे 20, 0,14 आणि 1 अशा धावा केल्या आहेत. ( captain) त्यामुळे कॅप्टन हार्दिक तिलकला डच्चू देणार की विश्वास दाखवत प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.पंजाब आणि मुंबईत यांच्यात गुरुवारी 16 एप्रिलला होणारा 35 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघातील 34 सामन्यांचा निकाल पाहिल्यास दोन्ही संघ तुल्यबळ आहेत असंच म्हणावं लागेल. दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुरुवारी कोणता संघ विजय मिळवून आघाडी घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. मात्र दुर्देव असं की बुमराहची या मोसमातील 4 सामन्यानंतरही पहिल्या विकेटची प्रतिक्षा कायम आहे. मात्र बुमराहला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करणं धाडसाचं ठरेल. (captain) त्यामुळे बुमराह पंजाब विरुद्ध कशी कामगिरी करतो हे बॉलिंगदरम्यानच स्पष्ट होईल.तसेच मुंबईचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा याला आरसीबी विरूद्धच्या दुखापतीमुळे पंजाब विरुद्ध खेळता येणार नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात नाही. त्यामुळे आता कॅप्टन हार्दिक बदलाच्या संकेतानंतर काय निर्णय घेतो याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत वानखेडे स्टेडियमध्ये एकूण 10 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियममध्ये प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत.पंजाब विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे आणि जसप्रीत बुमराह.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय