BCCI पाकिस्तानला आशिया कपमधून करणार बाहेर, दिग्गज क्रिकेटरने केला दावा

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची माहिती समोर आल्यावर भारत सरकारने(BCCI) आता पाकिस्तान विरुद्ध मोठी पाऊल उचलली आहेत.

आता पहलगाम हल्ल्याचा बदला बीसीसीआय(BCCI) सुद्धा घेऊ शकते. 2025 च्या सप्टेंबर महिन्यात टी 20 फॉरमॅटमध्ये एशिया कप खेळवला जाणार आहे. याचं यजमानपद हे भारत आणि श्रीलंकेकडे असणार असून या स्पर्धेतून बीसीसीआय पाकिस्तानला बाहेर काढू शकते असा दावा सुनील गावसकर यांनी केला आहे.

सुनील गावसकर यांचं म्हणणं आहे की, ‘पहलगाम हल्ल्यानंतर आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. अशातच आता पाकिस्तानचा आशिया कपमध्ये सहभाग जवळपास अशक्यच मानला जात आहे. बीसीसीआय नेहमीच भारत सरकारच्या आदेशाला मानत आली आहे. अशातच आशिया कपच्या आयोजनाबाबत सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळू शकतं.

गावस्करने सांगितलं की, ‘बीसीसीआयचं(BCCI) नेहमी तेच करत जे त्यांना भारत सरकार सांगतं. त्यामुळे मला वाटत नाही की आशिया कपच्या बाबत यात कोणताही बदल होईल. आशिया कपच्या या एडिशनचं यजमानपद हे भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे मी आता पाकिस्तानला आशिया कपचा भाग बनताना पाहत नाही’. परंतु हे सांगताना गावसकर यांनी असेही म्हटले की पुढील दोन महिन्यात दोन्ही देशांमधील संबंध कसे राहतात यावर खूप काही अवलंबून असेल.

सुनील गावसकर यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानला जर स्पर्धेतून बाहेर करायचं असेल तर एशियन क्रिकेट काउंसिल ला भंग करावं लागेल. म्हणजेच ACC चं भविष्य सुद्धा धोक्यात असून जर दोन्ही देशांमधील हे संबंध सुधारले नाहीत तर ACC चं अस्तित्वच उरणार नाही. गावसकरांच म्हणणं आहे की आशिया कपच्या जागी फक्त 3 किंवा 4 देशांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते.

पुढे गावस्कर म्हणाले की, ‘मला माहित नाही हे कसं होईल. कदाचित ACC भंग करावं लागू शकतं आणि केवळ तीन देशांचा दौरा केला जाऊ शकतो, ज्यात फक्त तीन देशांमध्ये ही स्पर्धा होऊ शकते. किंवा 4 देशांमध्ये स्पर्धेचे आयोजन केलं जाऊ शकतं ज्यात हॉंगकॉंग किंवा यूएईचा समावेश केला जाऊ शकतो. परंतू हे सगळं पुढील दोन महिन्यात भारत – पाकिस्तानचे संबंध कसे राहतात यावर अवलंबून आहे’.

हेही वाचा :

शरद पवार भाकरी फिरवणार, रोहित पवारांचा ‘तो’ आग्रह अखेर पूर्ण होणार?

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांवर भारतात बंदी

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; तब्बल ‘इतके’ अर्ज झाले बाद, कारण काय तर…