पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले. याअंतर्गत भारताने पाकिस्तानच्या तब्बल ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाचे वातावरण आहे. भारत-पाकिस्तान युद्धाचे बिगुल आता वाजले असून हा मुद्दा आता जागतिक चर्चेचा विषय बनला आहे. याच पार्शवभूमीवर आता भारत-पाकिस्तान हल्ल्यासंबंधीचे अनेक व्हिडिओ(video) सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. असाच एक व्हिडिओ नुकताच सामोर आला आहे ज्यात भारतातील काही भाविक पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी देवीला साकडं घालताना दिसून आली.

वृत्तसंस्था एएनआयने एक व्हिडिओ(video) शेअर केला आहे. ज्यामध्ये जय कुमार दास नावाचा एक भक्त म्हणतो, “देवी माँ, मला काहीही नको आहे, कृपया आमच्या सैन्याला इतकी शक्ती द्या की ती पाकिस्तानला पूर्णपणे नष्ट करू शकेल. पाकिस्तान वारंवार भारतावर हल्ला करत आहे.” पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही… आम्हाला मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे… मी कामाख्या मातेला भारतीय सैन्याला बळ देण्याची प्रार्थना करतो. आम्हाला सत्ता देऊ नका. प्रथम आपले रक्षण करणाऱ्यांना बळ द्या जेणेकरून ते पाकिस्तानला धडा शिकवू शकतील आणि सुरक्षितपणे घरी परतू शकतील.”
तर दुसऱ्या भक्ताने सांगितले, “भारतीय सैन्याने केलेल्या प्रचंड कामाचा आम्हाला अभिमान आहे. दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत त्यांनी हे करत राहिले पाहिजे. आम्ही त्यांना सलाम करतो.” जय हिंद!…” भक्त शुमिता रॉय म्हणतात, “आम्ही प्रार्थना करतो की (पहलगाम) हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना आई शक्ती देवो… जे अजूनही दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी लढत आहेत, आई त्यांना दहशतवादावर मात करण्यासाठी शक्ती देवो.”
#WATCH | Devotees offer prayers and seek blessings for the Indian army at Kamakhya temple in Guwahati, Assam.
— ANI (@ANI) May 9, 2025
Pakistan made failed attempts to send swarm drones all across the LoC and International Borders (IB) yesterday. Over 50 drones were successfully neutralised during a… pic.twitter.com/dhsGAom1Qs
व्हिडिओमध्ये भाविक कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची पूजा करताना, दिवे लावताना, नारळ फोडताना आणि देवीला साकडं घालताना दिसून आली. भारत-पाकिस्तान या दोन्हीही देशांमधे धार्मिक मान्यता फार आहे. कोणत्याही परिस्थितीतून बाहेर निघायचे असले तर लोक देवी-देवतांकडे साकडं घालतात आणि त्यांची पूजा करतात. असे केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात अशी लोकांची श्रद्धा आहे आणि याच श्रद्धेच्या जोरावर लोक आता पाकिस्तानला नष्ट करून टाकण्याचं साकडं देवापाशी घालत आहेत.
हेही वाचा :
मातृभूमीचं रक्षण करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
महाराष्ट्र हादरला! 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; दुकानाचे शटर बंद केले आणि…