मातृभूमीचं रक्षण करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षामध्ये, मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्राच्या एका सुपुत्रासह दोन भारतीय जवानांना वीरमरण(death) आले आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर, पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. भारतीय सैन्यदल या आगळीकीला जोरदार प्रत्युत्तर देत असून, सीमेवर तणावपूर्ण शांतता असली तरी चकमकी सुरूच आहेत.

पाकिस्तानच्या कपटी हल्ल्यांना परतवून लावताना, मुंबईतील घाटकोपर येथील कामराज नगर येथे वास्तव्यास असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असलेले सैनिक मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण आले. नाईक कुटुंब काही काळ कामराज नगर येथील झोपडपट्टीत राहत होते, परंतु पुनर्विकासामुळे त्यांची घरे तोडण्यात आल्याने ते सध्या आंध्र प्रदेशात स्थायिक झाले आहेत.

मुरली नाईक यांच्या बलिदानाबद्दल घाटकोपर वार्ड क्रमांक १३३ मध्ये बॅनर लावून स्थानिक नागरिकांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. या बॅनरनुसार, ९ मे रोजी पहाटे ३ वाजता भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत झालेल्या चकमकीत मुरली नाईक शहीद झाले.

याच संघर्षात, भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण(death) प्राप्त झाले. गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी होते. “देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना आहेत,” असे मुख्यमंत्री नायडू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, “भारत एक उदयीमान शक्ती आहे, तर पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या मागे पडत आहे. दोन्ही देशांनी स्वतःला विनाशाच्या खाईत ढकलणे थांबवावे. जम्मू-काश्मीरमधील लोक, विशेषतः सीमावर्ती भागातील नागरिक दररोज या संघर्षाचा सामना करत आहेत.”

यावेळी बोलताना त्या भावूक झाल्या आणि म्हणाल्या की, “आपल्या मातांना आणखी किती काळ या वेदना सहन कराव्या लागणार आहेत? दहशतवादी तळ नष्ट करण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण झाले असेल, तर आता हे युद्ध थांबले पाहिजे.” त्यांच्या या वक्तव्यातून सीमेवरील नागरिकांच्या व्यथा आणि शांततेची गरज अधोरेखित होते. या दोन जवानांचे बलिदान (death)देशासाठी एक मोठी हानी असून, त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला देश सदैव स्मरणात ठेवेल.

हेही वाचा :

मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! जारी केल्या महत्वाच्या सूचना

महाराष्ट्र हादरला! 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; दुकानाचे शटर बंद केले आणि…

पेट्रोल-डिझेल महागणार? भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलचे पेट्रोल-डिझेलवर मोठं वक्तव्य