कोल्हापूरमधील खळबळजनक हत्याकांड : एकतर्फी प्रेमातून जिवलग मित्राचा खून!

केर्ले (ता. करवीर) – चित्रपटाला शोभणाऱ्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बालपणापासूनचे जिवलग मित्र असलेल्या दोन तरुणांमध्ये एका मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेला वाद इतका वाढला की त्याचा शेवट थेट हत्येत(Murder ) झाला. या घटनेने केवळ गावच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.

प्रेमातून शत्रुत्व आणि मग घातपात

महेंद्र प्रशांत कुंभार (वय 17 वर्षे 7 महिने) आणि त्याचा अल्पवयीन मित्र दोघेही लहानपणापासून एकत्र वाढले. शालेय शिक्षणही बारावीपर्यंत एकत्र घेतले. त्यांच्यातील मैत्री घराघरात चर्चेचा विषय होती. मात्र, दोघांचं लक्ष एका मुलीकडेच गेलं आणि इथूनच त्यांच्या नात्याला दुःखद वळण लागले.

तिच्याशी महेंद्र अधिक बोलत असल्याने दुसऱ्या मित्राच्या मनात चीड निर्माण झाली. काही महिन्यांपूर्वी यावरून त्यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर दोघांनी बोलणेच बंद केले. परंतु, राग आणि मत्सर दिवसेंदिवस वाढतच गेले.

one-sided love leads to murder

घटनादिवशीचा थरार

3 जून रोजी रात्री 8.30 वाजता आरोपीने महेंद्रला फोन करून हनुमाननगरजवळील दगडाच्या खणीजवळ बोलावले(Murder ). तिथे पुन्हा एकदा वाद झाला. महेंद्रने समजावण्याचा प्रयत्न केला, पण रागाने अंध झालेल्या आरोपीने त्याला थेट सुमारे 100 फूट खोल खणीत ढकलले. त्यानंतर महेंद्रचा मोबाईल फोडून तोही खणीत टाकला. दुचाकीची चावीही फेकून दिली आणि आरोपी तेथून फरार झाला.

रात्रीचा शोध आणि सकाळचा मृत्यू

महेंद्र घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. अखेर खणीत बेशुद्ध अवस्थेत तो आढळून आला. तत्काळ त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू(Murder ) झाला.

पोलिसांचा सखोल तपास आणि आरोपीची कबुली

करवीर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे संशयित मित्रावर लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सामाजिक संदेश

ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे – की प्रेम, मत्सर आणि असंवेदनशीलता कशी मैत्रीसारख्या पवित्र नात्याचं रूपांतर दुःखद शेवटात करू शकते. पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन तरुण पिढीच्या मानसिक आरोग्यावर आणि भावनिक विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक झाले आहे.

हेही वाचा :