वास्तवातील “काश्मीर फाइल्स”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांड (Terrorist attack)झाल्यानंतर भारताचे नंदनवन असलेले काश्मीर खोरे ओस पडले आहे. सर्व पर्यटक आपापल्या राज्यातील आपापल्या गावात पोहोचले आहेत. निरा प्रा आणि निशस्त्र अशा 28 पेक्षा जास्त पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या आणि तेही त्यांच्या कुटुंबियांना साक्षी ठेवून. तेथून परतलेल्या प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे. करता पुरुष गमावलेल्या कुटुंबांची अवस्था प्रत्येक भारतीयाला निशब्द करून टाकणारी आहे. वास्तवातील ही “काश्मीर फाईल” विठ्ठल सदृश्य परिस्थिती निर्माण करणारी आहे आणि त्याचे भयावह परिणाम दहशतवाद्यांची राजधानी असलेल्या पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत आणि तो दिवसही फार दूर नाही.

गुरुवारी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सुरक्षा यंत्रणांकडून झालेल्या चुकीची कबुली देऊन याच विषयावर देशभर होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे प्रथमच देशावर आलेल्या संकटाचे कुणीही राजकारण केलेले नाही. संपूर्ण देश दहशतवाद्यांच्या(Terrorist attack) विरुद्ध एकवटला असल्याचा संदेश या निमित्ताने पाकिस्तानला दिला गेला आहे. ज्या हेतूने या हल्ल्याचे नियोजन केले गेले होते तो हेतूच असफल झाल्याचे दुःख दहशतवादी संघटनांना आणि पाक राज्यकर्त्यांना झाले आहे.

पहलगाम दहशत(Terrorist attack) कांडानंतर देशभर निषेधात्मक आंदोलने झाली पण या आंदोलनात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजही सहभागी झाला होता. भारतातील कट्टरतावादी नेत्यांनीही या दहशतवाद्यांचा धिक्कार केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जण शहीद झाले आहेत. त्यामुळे दुःखात असलेल्या महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले अनेक कार्यक्रम आणि समारंभ रद्द करण्यात आले आहेत.

राज्य शासनाने ही नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. शहीद झालेल्या पर्यटकांच्या घरी त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची रीघ लागली आहे. दहशतवाद्यांना कशा पद्धतीने गोळ्या घातल्या जातील त्याचे व्हिडिओ व्हायरल करा. दहशतवादी कसा मरतो आहे हे आम्हाला पहावयाचे आहे अशा शोक संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांच्या आहेत.

आता खूप झाले!, असे दहशतवादी हल्ले भारताच्या भूमीत येथून पुढे केव्हाही होणार नाहीत इतकी दहशत बसवा. दहशतवाद्यांचा सुपडासाप करा. अशी भारतीयांची सार्वत्रिक भावना आहे. त्याचे प्रातिनिधीक प्रतिबिंब गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिसले.

आता दहशतवाद्यांच्या(Terrorist attack) विरोधात, त्यांना रसद पुरवणाऱ्यांच्या विरोधात, त्यांना आश्रय देणार्‍यांच्या विरोधात आरपारची लढाई होईल असे स्पष्ट संकेत भारताने दिले आहेत. येत्या आठ किंवा पंधरा दिवसात भारताकडून पाकिस्तानवर लष्करी कारवाई होईल असे भारतातील पाकिस्तानच्या निवृत्त राजदूतानी पाकिस्तान सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे.

भारताच्या कोणत्याही प्रकारच्या कारवाईला जशास तसे उत्तर दिले जाईल असे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी उसने अवसान आणून सांगितले आहे. प्रत्यक्षात मात्र भारतासमोर चार-सहा दिवस सुद्धा पाकिस्तान टिकणार नाही असे युद्ध विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे. सध्या नवी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे. दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला अद्दल घडेल इतका मोठा दणका देण्याचे नियोजन सुरू आहे.

दोन देशांमधील सिंधू पाणी वाटप करार भारताने मोडीत काढला असला तरी त्याचे दृश्य परिणाम तातडीने दिसतील असे नाही. कारण पाणी अडवण्याचे तात्कालीक नियोजन कोणतेही नाही. सीमा सील केल्यामुळे पाकिस्तानात जमिनीवरून होणारे मालवाहतूक बंद झाली आहे. त्याचे परिणाम येत्या दोन-तीन दिवसात दिसू लागतील. विविध कारणांसाठी भारतामध्ये आलेल्या पाकिस्तानच्या सर्व नागरिकांना तातडीने देश सोडून जाण्याचे आदेश काढण्यात आल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोल्हापुरातही व्हिसा घेऊन आलेले पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यांचे पत्ते शोधून पोलीस तेथे पोहोचले आहेत.

एकूणच पाकिस्तान विरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. बदला घेण्याची मागणी होऊ लागली आहे. येत्या काही दिवसात भारताकडून निश्चितपणे मोठी कारवाई होईल असा विश्वास सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण होईल अशा हालचाली नवी दिल्लीत सुरू आहेत.

हेही वाचा :

पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार? भारत उचलणार मोठे पाऊल

अंगणात खेळत होता चिमुकला इतक्यात साप आला अन्…; थरारक VIDEO व्हायरल

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना!