भारत-पाकिस्तान युद्ध होणार?; 7 मेपासून देशभरात मॉक ड्रिल

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला असून, संभाव्य युद्धजन्य(war) परिस्थितीचा विचार करता केंद्र सरकारने देशभरात 7 मेपासून व्यापक स्तरावर मॉक ड्रिल (सराव मोहीम) राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मॉक ड्रिलद्वारे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतील नागरी संरक्षण यंत्रणांची क्षमता तपासली जाणार आहे.

या मॉक ड्रिलसाठी देशातील 244 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, सायरनच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना युद्धजन्य(war) परिस्थितीत आपला बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण या काळात दिलं जाणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरू असून, केंद्र सरकार युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा सराव करत आहे.

1971 नंतर पहिल्यांदाच इतका व्यापक मॉक ड्रिल :
यापूर्वी 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचा मोठा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर 2025 मधील हा मॉक ड्रिल अधिक संवेदनशील मानला जात आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे.

सरावादरम्यान एअर स्ट्राईक, ब्लॅकआउट, सायरन कार्यान्वयन, हेरिटेज इमारतींचं संरक्षण, आणि आपत्कालीन बचाव मोहिमांचा समावेश असणार आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सजगता निर्माण होईल आणि संभाव्य त्रुटी ओळखून योग्य सुधारणा करता येतील.

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी अपडेट!

केवळ 6,499 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone

दहावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या संभाव्य तारीख