लग्नासारख्या(marriage) पवित्र नात्याचा गैरवापर करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केली आहे. रिसोड पोलीसांनी टोळीतील तीन महिला आणि एक पुरुष यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ४४ हजार रुपयांचे दागिने आणि १ लाख २५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलीसांनी सांगितले की, ही टोळी अत्यंत शिताफीने मुलगी दाखवून लग्न(marriage) लावण्याचे युक्तीने कुटुंबांना फसवत असे. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी सोबत घरातील सोनं आणि रोख रक्कम घेऊन फरार होत असे.

यामुळे पीडित कुटुंब आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या उद्ध्वस्त होत असे. तपासादरम्यान समोर आले की, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक कुटुंबांना या टोळीने अशाच पद्धतीने फसवले आहे.रिसोड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले. प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस सध्या तपास सुरू आहेत.
हेही वाचा :
यंदाची दिवाळी धो धो पावसात जाणार! मान्सूनचा परतीचा प्रवास…
Abhishek Sharma च्या दमदार खेळीनंतर बहिणचं रिएक्शन Viral
ब्रेन ड्रेन थांबणार….! भारतीयांच्या नोकऱ्याही धोक्यात…