1 मेपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली असून तीन जिल्हे सुपर हॉट राणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, विदर्भातील काही ठिकाणी 2 मे पासून पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात ऊन आणि पावसाच्या खेळामुळे नागरिक हैराण झाले होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेने अक्षरश: कहर केला होता. हवामान विभागाने मे महिन्यासाठीही ताजा अंदाज वर्तवला आहे.(districts) त्यानुसार मे महिन्यात उष्ण वातावरण कायम राहणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
राज्यभरात मे महिन्यात तापमान झपाट्याने वाढणार आङे. अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार असून या जिल्ह्यांना ‘आयएमडी’ने यलो अलर्ट दिला आहे. 1 मेपासूनच राज्याचे तापमान अत्यंत उष्ण होण्यास सुरूवात होणार आहे. बहुतेक भागांत हवामान कोरडे राहणार असले तरी अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती तीव्र होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, 1 मे रोजी, कोकण किनारपट्टीच्या काही भागांत वातावरण दमट राहणार आहे. येथे किमान तापमान 25 अंश सेल्सियस ते 27 अंश सेल्सियसदरम्यान असणं अपेक्षित आहेत. दरम्यान, कमाल तापमान 33 अंश सेल्सियस ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहणं अपेक्षित आहे. (districts) दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 26 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल.
मराठवाड्यातही दिवसभर तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअस असेल. दरम्यान, कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस ते 41 अंश सेल्सिस असेल. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहून कमाल तापमानाचा पारा 40 ते 43 अंशावर पोहोचण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक नागरिक उष्मघाताचे बळी पडले आहेत. नागपूरात गेल्या 10-12 दिवसांमध्ये एकूण 15 जणांना जीव गमवावा लागला आहे.नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दुपारी नागरिकांना घरातून बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे. वर्ध्यातही कमाल तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस असणार आहे.
मुंबईत 1 मेपासून पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. (districts) याशिवाय 2 मेपासून विदर्भातील काही ठिकाणी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट
कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा