महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

मुंबई: राज्यातील सर्वत्रच कडाक्याचे ऊन जाणवत आहे. उष्णतेची लाट आल्यासारखे झाले आहे. तरी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. दरम्यान हवामान (Weather) विभागाने येत्या काही दिवसांत देखील राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याची इशारा देण्यात आला आहे.

हवामान(Weather) विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा,वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासाह, जोरदार मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वातावरण कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात तापमानाचा पारा घसरला आहे. नाशिकम सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत तापमानात घट झाली आहे. त्यामुळे हवामान(Weather) विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मुंबईमधील तापमानामध्ये वाढ होत आहे. तर तापमानात वाढ होत असतानाच मुंबईत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात तर तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ४४ अंशाच्या यावर पोहोचले आहे. कडक उन्हाळा जाणवत आहे. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर गरज असल्याच दुपारच्या वेळेस घराबाहेर पाडण्याचे आवाहन केले आहे.

पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून तापमानाचा पारा ४२. १ अंश सेल्सिअसपर्यंत पाेचला आहे. पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. त्यामुळे नागरीकांनी घरातुन बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हेही वाचा :

पॉर्नोग्राफी कंटेंटवर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणी

पीएम किसान योजनेत मोठे बदल! ‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही

वीरशैव लिंगायत समाजातर्फे अक्षय तृतीयेस शिव-बसव जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार