भर उन्हाळ्यात राज्यात हवामानात मोठे बदल घडत आहेत. अनेक भागांमध्ये तापमानात अचानक घट झाली असून, आकाशात काळे ढग दाटले आहेत. विदर्भात तर वादळी पावसाचा(rain) इशारा दिला गेला आहे. मात्र, ही स्थिती खरी मान्सून नाही, तर मान्सूनपूर्व सरींचा परिणाम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या उत्तर भागात उष्णतेची लाट कायम असतानाही विदर्भात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची(rain) शक्यता आहे. पूर्व विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकण, मुंबई आणि पालघरमध्ये ढगाळ वातावरण आणि गारव्याची अनुभूती मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजस्थानच्या नैऋत्य दिशेपासून चक्राकार वाऱ्यांची निर्मिती आणि महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कोकण आणि मुंबईसह अनेक भागात पहाटेच्या सुमारास आकाशात ढगांची दाटी पाहायला मिळत असून हवेत गारवा जाणवत आहे.
मात्र, परभणी, अकोला, वाशिम आणि ब्रह्मपुरी या भागांमध्ये अजूनही पारा 41 ते 42 अंशांदरम्यान आहे. बुलढाण्यात तापमान 40 अंशांवर नोंदवले गेले आहे. त्यामुळे तापमानातील ही घट किती दिवस टिकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मान्सूनचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये आधीच समाधानकारक पर्जन्यमान नोंदवले जात आहे. 1 मार्च ते 27 एप्रिलदरम्यान, केरळमध्ये सरासरीच्या 39 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यामुळे केरळसह महाराष्ट्रातील हवामानातही बदल होतो आहे.

राज्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान बदलांबाबत सतर्क राहावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट