मुंबई : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकारण (political updates)रंगले आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट अर्थात पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे राज-उद्धव यांच्यामधील दरी कमी होऊन ठाकरे कुटुंब देखील एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावरुन भाजप नेते व मंत्री नितेश राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा(political updates) रंगल्या आहेत. दरम्यान, भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केल्यानंतर चर्चांना जोर आला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, याच्यात विरोधाभास कसा आहे बघा, आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत सांगतात, आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत हे सांगतात, एकत्र आले पाहिजे सांगतात, आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा एकत्र येत नाहीत, याचा अर्थ मोदींच्या मुख्य दुकानासोबत त्यांना आपले छोटे दुकान चालवायचे आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, “प्रफुल पटेल महान नेते नाहीत, तटकरे आता अध्यक्ष आहेत, उद्या हा पक्ष विलीन होणार नाही अशी माझी माहिती आहे, पण झाला तर तटकरेंनी काय करायचे, केंद्रातील मंत्री पदांचा प्रश्न निर्माण होईल, प्रत्येक जण आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, असे देखील स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत व्यक्त केले. मात्र यावरुन भाजप नेते व मंत्री नितेश राणे आक्रमक झाले आहेत. दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याची संजय राऊत यांची घाणेरडी सवय आहे,” असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय(political updates) विषयांवर भाष्य केले आहे. मंत्री नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याची संजय राऊत यांची घाणेरडी सवय आहे. दोन्ही ठाकरे एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेंचा एक गट प्रयत्नशील आहे, याची माहिती संजय राऊत का देत नाही? दोन्ही पवार एकत्र कधी यायचे ते ठरवतील. मात्र, दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी मातोश्रीचा कुठचा माळा काम करतोय याची थोडी माहिती संजय राऊत यांनी द्यावी,’ अशी टोलेबाजी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे मंत्री नितेश राणे म्हणाले की, “जयंत पाटील यांची जागा रोहित पवार यांना घ्यायची होती. त्यामुळे रोहित पवार यांचं हे षडयंत्र असू शकतं, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. पुढे ते म्हणाले की, “महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढायच्या की स्वबळावर लढायच्या? याचा निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतील त्यावर कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू, अशी भूमिका भाजप नेते नितेश राणे यांनी घेतली आहे.
तसेच जी व्यक्ती अन्य वेळी देशभक्तीवर आपले चित्रपट काढून खिसे भरतात, मात्र पहलगाम हल्ला झाल्यानंतर साधं ट्विट पण कोणाला वाचायला मिळालं नाही. एवढा मोठा हल्ला पाकिस्तानने केला तेव्हा यांचं पाकिस्तानचं प्रेम उफाळून आलं असेल. यांना आपलं देशप्रेम दिसत नसेल तर यांना आपण त्यांचे चित्रपट बघून मोठे का करावे?” असा सवाल भाजप मंत्री नितेश राणे यांनी अभिनेता शाहरुख खान व अमीर खान यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :