मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

खंडाळा घाटात आज सकाळपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली (passengers) असून मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या वाहनांना तासन् तास घाटात अडकून पडावे लागले. उष्णतेमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.(passengers) मात्र १ मेनंतर शनिवार-रविवार सुट्टी असल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने प्रवासाला निघाले आणि त्यामुळे घाटात प्रचंड ट्रॅफिक जॅम झाला. एकीकडे या प्रकल्पाची जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली असताना दुसरीकडे उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागला.

दरम्यान, या वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त (passengers) करत प्रवाशांची माफी मागितली. ‘मिसिंग लिंक’ऐवजी ‘कनेक्टिंग लिंक’ असे नाव देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनाही या कोंडीचा फटका बसला असून त्यांनी व्हिडिओद्वारे परिस्थिती मांडली. जवळपास ७१८१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प भविष्यात वाहतूक सुलभ करणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट

कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार