मुंबई – राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतर्गत ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या(farmers) बँक खात्यात १८९२ कोटी ६१ लाख रूपये हप्ता मंगळवारी (दि. ९) जमा करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान सन्मान योजनेच्या अनुषंगाने राज्य सरकारने नमो शेतकरी(farmers) योजना सुरू केली आहे. याअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रूपये मिळतात, जे तीन हप्त्यांमध्ये वितरीत केले जातात. यापूर्वी पंतप्रधानांनी २० वा हप्ता वितरीत केला होता आणि आज राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील वादावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या प्रकरणाचा अहवाल मला अद्याप मिळालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपोर्ट मागितला आहे. अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अनेकदा निवेदनामध्ये सांगितलेली परिस्थिती प्रत्यक्षात वेगळी असते. अशावेळी अधिकारी वस्तूस्थिती समोर आणतात.”

फडणवीस यांनी असेही सांगितले की, “मी स्वतः या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागविला आहे आणि त्यानुसार योग्य कारवाई केली जाईल.”

हेही वाचा :

उद्योजकाच्या पत्नीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली- ‘आम्ही एकत्र अंघोळ करायचो’

GST कपातीनंतर 11 लाख रुपयांनी स्वस्त झाल्या Luxury Cars

‘धोनीमुळे मी गिरगिट झालो होतो…’, दिनेश कार्तिक माही बद्दल असं का म्हणाला?