फोनची बॅटरी दिवसभर टिकत नाही? मग या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा

स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपण्याची समस्या अनेक वापरकर्त्यांना भेडसावत असली तरी काही सोप्या सवयी अंगीकारल्यास या त्रासावर सहज मात करता येऊ शकते. वाढत्या वापरामुळे फोनची बॅटरी झपाट्याने कमी होते, पण तज्ज्ञांच्या मते काही सेटिंग्जमध्ये बदल आणि योग्य चार्जिंग पद्धती अवलंबल्यास बॅटरीचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढवता येते.

यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्क्रीन ब्राइटनेस. जास्त ब्राइटनेस बॅटरी जलद खर्च करतो, (battery) त्यामुळे गरजेनुसार ब्राइटनेस कमी ठेवणे किंवा ऑटो-ब्राइटनेस वापरणे फायदेशीर ठरते. तसेच स्क्रीन टाइमआउट कमी ठेवल्यास फोन वापरत नसताना स्क्रीन पटकन बंद होते आणि बॅटरी वाचते.

फोनमधील अनेक ॲप्स आपण वापरत नसतानाही बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. या ॲप्समुळे डेटा आणि लोकेशनचा वापर वाढतो आणि बॅटरी जलद कमी होते. (battery) त्यामुळे अनावश्यक ॲप्सची बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी बंद करणे आवश्यक आहे.ब्लटूथ, वाय-फाय आणि लोकेशन यांसारखी फीचर्स सतत सिग्नल शोधत असल्याने बॅटरीवर ताण येतो. वापर नसताना ही फीचर्स बंद ठेवणे अधिक योग्य ठरते. विशेषतः AMOLED स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनमध्ये डार्क मोडचा वापर केल्यास कमी ऊर्जा वापरली जाते आणि बॅटरी जास्त काळ टिकते.

चार्जिंगच्या सवयींचाही बॅटरीवर मोठा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते फोन पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देणे किंवा १०० टक्के चार्ज करणे टाळावे. बॅटरी २० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान ठेवणे अधिक सुरक्षित मानले जाते. (battery) तसेच नेहमी मूळ चार्जरचा वापर करणे आणि उष्ण वातावरणात चार्जिंग टाळणे आवश्यक आहे.या छोट्या पण प्रभावी सवयींचा अवलंब केल्यास स्मार्टफोनची बॅटरी अधिक काळ टिकू शकते आणि तिची कार्यक्षमता दीर्घकाळ चांगली राहते.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?