कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : घरात पूर्णपणे राजकीय वातावरण असताना राजकीय (politics) मंचावर अगदी क्वचित उपस्थिती दाखवणाऱ्या, शिवसैनिकांच्या “मॉसाहेब” अर्थात मीनाताई ठाकरे यांनी कधीही राजकारणात सक्रिय भागीदारी केली नाही आणि नव्हती. आयुष्यभर बाळासाहेबांची सावली म्हणून त्या वावरल्या. बुधवारी अचानक त्या मरणोत्तर चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या. शिवाजी पार्क प्रवेशद्वारावर असलेल्या त्यांच्या पुतळ्याला कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने लाल रंग फासला. समाजकंटकाच्या माध्यमातून मुंबईत वातावरण तंग करण्याचे, दूषित करण्याचे हे कलरफुल राजकारण खेळले गेले आहे. त्याचा धिक्कारच केला पाहिजे आणि तो केला जातो आहे.

मीनाताई यांचे सासरे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे हे पत्रकार, समाजकारणी आणि राजकारणी होते. त्यांचे पती बाळासाहेब ठाकरे हे तर पत्रकार आणि मुरब्बी राजकारणी(politics) होते. शिवसेनेचे ते संस्थापक प्रमुख होते. मातोश्री बंगल्यावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची कायम वर्दळ असायची. एकूणच घरात पूर्णपणे राजकीय वातावरण असायचे.
बाळासाहेबांच्या जाहीर सभा वगैरेच्या निमित्ताने मीनाताई या त्यांच्याबरोबर असायच्या. अगदी क्वचित प्रसंगी त्या व्यासपीठावर दिसायच्या. बाळासाहेबांची सावली अशीच त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. शिवसैनिकांना मायेची ऊब त्यांच्याकडून मिळायची आणि म्हणूनच त्यांना मॉ साहेब म्हटले जायचे. त्यांचा शिवाजी पार्क परिसरात पुतळा बसवण्यात आला होता.
मंगळवार ते बुधवार दरम्यानच्या मध्यरात्री केव्हातरी कुणीतरी या पुतळ्याला लाल रंग फासला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. खळबळ उडाली. शिवसैनिकांनी गर्दी केली, पदाधिकारी आले, आमदार आले, राज ठाकरे आले, उद्धव ठाकरे आले. पोलीस आले आणि आधीच संवेदनशील असलेला हा परिसर तणावग्रस्त बनला. निषेदाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. गृहराज्यमंत्री योगेश कदयांनीनी ही घटना निंदनीय आहे. असे भ्याड कृत्य करणाऱ्या समाजकंटकाला आम्ही शोधून काढू असे ते म्हणाले. मुंबईतील मीडियानेही हे प्रकरण उचलून धरले आणि दिवसभर चर्चेत ठेवले.
शिवाजी पार्क हा संपूर्ण महाराष्ट्राला(politics) संवेदनशील परिसर म्हणून माहित आहे. उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती या भागात आहे. साहजिकच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून संशयित समाजकंटकाची माहिती पोलिसांना निश्चित उपलब्ध होईल आणि पोलीस हे त्या समाजकंटकापर्यंत पोहोचतील.
दोनच दिवसापूर्वी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना खेळला गेला. अशा प्रकारचा सामना खेळण्यास केंद्र शासनाने तथा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तसेच भारतीय क्रिकेट संघटनेने परवानगी दिल्याबद्दल देशभर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. सिंधू जलकरारस्तगीत करताना रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे तेव्हा म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्त आणि क्रिकेट कसे काय चालू शकते असा सवाल उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने विचारला गेला होता.
ज्या दिवशी सामना खेळला गेला त्या दिवशी ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने राज्यभर”माझं कुंकू माझा देश”हे आंदोलनात्मक अभियान हाती घेतलं होतं आणि नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवण्याचा निर्धार केला होता आणि राज्यभरातील महिलांना तसे आवाहनही केले गेले होते. या आंदोलनाचा या पुतळा विटंबनेशी संबंध असू शकतो. सिंदूर म्हणजेच कुंकू आणि कुंकू हा लाल भडक असतो. असाच लाल भडक रंग मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला फासण्यात आला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस होता. हे औचित्य साधून कुणीतरी कुणाच्यातरी सांगण्यावरून हे लाल रंगाचे गलिच्छ राजकारण खेळले गेले आहे असे म्हणता येईल.
भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ऑपरेशन सिंदूर ची आठवण उद्धव ठाकरे शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला करून दिलेली
आहे. त्यातून या दोन पक्षांमध्ये संघर्ष उडावा. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला भारतीय जनता पक्षाच्या कुणीतरी लाल रंग फासला आहे असा संदेश मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचावा. आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण व्हावी असा दुष्ट आणि गलिच्छ हेतू मनात ठेवून केले गेलेले हे कृत्य आहे. ते निंदनीय आहे.
मुंबई पोलिसांनी पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला शोधून काढून त्याला जनतेसमोर उभे करावे. असे करण्यामागे त्याचा हेतू काय होता किंवा त्याचा बोलाविता, करवीता धनी कोण होता याचा छडा लावावा. राजकारणाशी सक्रिय संबंध नसलेल्या मीनाताई ठाकरे यांच्यासारख्या स्त्रीच्या पुतळ्याचा गलिच्छ राजकारणासाठी उपयोग केला जातोय हेच शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे.
हेही वाचा :
भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचं मोठं कांड, नदीत कार फेकून मृत्यूचा बनाव रचला अन्…
Oppo ने लाँच केला नवा फोन, 7000mAh बॅटरीने सुसज्ज; किंमतही खिशाला परवडणारी
सातवीच्या मुलीचा मृतदेह तब्बल 20 दिवसांनी सापडला; निष्पाप जीवाचे तुकडे तुकडे केले अन्…