कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावचे भोंदू अशोक खरात प्रकरण, नाशिकच्या कार्पोरेट टीसीएस कंपनी मधील धर्मांतर व लैंगिक अत्याचार प्रकरण, अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथील “लव जिहाद कांड”, भोंदू मनोहर भोसले, शिवाजी कोण होता या पुस्तकावरून निर्माण झालेले वादंग, (religious conversion) दहिसर येथे धर्म विचारून दोघांवर झालेला सशस्त्र हल्ला, बाबा बागेश्वरचे वादग्रस्त वक्तव्य, अशा अनेक कारणावरून महाराष्ट्रात सध्या सामाजिक वातावरण कमाल पातळीवर गढूळ झाले आहे.

धर्म कलह वाढला आहे, त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतानाच कोल्हापूरच्या पुलाची शिरोली या छोट्याशा गावात काही तरुणींवर लैंगिक अत्याचार करून काही व्हिडिओ काढल्याची घटना घडली आहे. दोन तरुणांना आता काही झाली आहे आणि लव्ह जिहादच्या संशयावरून कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व घटनांमध्ये काही तरी निश्चित हेतू आहेत, आणि कुणाचे तरी सडके मेंदू हा हेतू साध्य करण्यात गुंतले आहेत. यात तीळ मात्र संदेह नाही.
परतवाडा येथील आयान तनवीर आणि त्याच्या मित्रांनी कितीतरी तरुणींचे आयुष्य उध्वस्त केले अगदी त्याचप्रमाणे शिरोलीच्या शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या दोघांनी 15 पेक्षा अधिक तरुणींना लव्ह जिहाद मध्ये अडकवून त्यांचे लैंगिक आणि मानसिक शोषण केले.
परतवाडा येथील पुनरावृत्तीच शिरोली मध्ये त्यांनी केलेली आहे. वास्तविक अशी संवेदनशील प्रकरणे तातडीने न्यायालयात दाखल करून निकालही जलद गतीने झाला पाहिजे. प्रेम प्रकरण एखाद्याच मुलीशी गृहीत धरले आहे. पण एकच तरुण अनेक तरुणींच्या चारित्र्याशी
खेळ करत असेल तर त्यामागे त्याचा हेतू निश्चितच वेगळा असतो. मोठ्या संख्येने तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांचे चारित्र्य नासवून टाकायचे. संबंधित तरुणींनी धर्मांतरच केले पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायची.
असा उद्देश अशा प्रकरणांमध्ये दिसून येतो. अर्थात धर्मांध शक्तींकडून या तरुणांना लव्ह जिहाद साठी प्रोत्साहित केले जात असल्याची चर्चा अगदीच अनाठाई आहे असे नाही. अतिशय नियोजनपूर्वक असे प्रकार घडवून आणले जात असतील तर शासन व्यवस्थेने कठोर उपाय योजना केल्या पाहिजेत अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न धोकादायक वळणावर येऊ शकतो.
हेही वाचा
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर