कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या दहा जागांसाठी निवडणूक लागणार, मतदान होणार असे वातावरण तयार झालेले असतानाच या निवडणुका आता बिनविरोध झालेल्या आहेत, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या (elections) गुरुवारच्या अखेरच्या दिवशी
शिवसेना तसेच भाजपने अतिरिक्त उमेदवार दिला नाही आणि काँग्रेसने ऐनवेळी मवाळ भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय घडामोडी घडल्या.

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध करू असे भाजपच्या वतीने सांगितले गेले होते. याचा अर्थ उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर आम्ही अतिरिक्त उमेदवार उभा करू हा भाजपने दिलेला इशारा पोकळ किंवा फोन ठरला आहे असे म्हणता येईल. कारण राष्ट्रीय काँग्रेसने आम्ही आमचा उमेदवार देऊ असे अप्रत्यक्षरीत्या सांगून या निवडणुकीत रंग भरले होते.
पण अखेरच्या क्षणी काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली आणि ठाकरे गटाचे उमेदवार अंबादास दानवे यांना समर्थन दिले आणि त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली.
राज्यसभेच्या एका जागेसाठी ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे नाव आधीच जाहीर केले. राष्ट्रीय काँग्रेसला राज्यसभेची जागा हवी होती पण नंतर त्यांनीही शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसला आपला उमेदवार माघारी घ्यावा लागला. आणि आता विधानपरिषद काँग्रेसला हवी होती पण तीही त्यांना मिळाली नाही.
आणखी दोन वर्षानंतर राज्यसभेची तसेच विधान परिषदेची जागा रिक्त होणार आहे तेव्हा राज्यसभेची रिक्त होणारी जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे, त्या जागेवर आमचा हक्क असेल अशी अप्रत्यक्ष अट घालून काँग्रेसने विधान परिषदेची जागा सोडली. त्यामुळे महाविकास आघाडी अबाधित राहिली आहे. काँग्रेसने आपला उमेदवार दिला असता तर आघाडी ची बिघाडी झाली असती. पण काँग्रेस कडे 16 मते होती आणि त्यांचा उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना किमान आणखी 12 मते मिळवावी लागली असती. बारा मते फोडणे शक्य नाही
हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार तसेच सतेज पाटील यांनी व्यवहारिक भूमिका घेऊन आणि दोन वर्षानंतरच्या राज्यसभेवरचा हक्क ठेवून किंवा तसा आमचा आग्रह राहील असे सांगून अंबादास दानवे यांना समर्थन दिले. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर असले पाहिजेत असा अप्रत्यक्ष आग्रह भाजपकडून का मांडला जात होता हे कळावयास मार्ग नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या आधार नसलेल्या वृत्ताचा या घटनेचे संबंध जोडला जाऊ शकतो. अर्थात अशी काही भेट झालेली नाही असा खुलासा फडणवीस यांनी तातडीने केला होता.
या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची ताकद वाढवली आहे. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात प्रभाव असलेल्या प्रहार या संघटनेचे विलीनीकरण त्यांनी घडवून आणले आणि त्यासाठी प्रहारचे बच्चू कडू यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवून एकनाथ शिंदे यांनी
माझ्यासोबत आलेल्या मंडळींना मी वाऱ्यावर सोडणार नाही असा एक संदेश त्यांनी शिवसैनिकांमध्ये पोहोचवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना विधान परिषदेवर पाठवले आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी वर सुनेत्रा पवार यांचीच पकड आहे हे स्पष्ट झाले आहे. अर्थात अजितदादा पवार यांचे विश्वासू अमोल मिटकरी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे तर ठाकरे गटाच्या शिवसेनेत सुषमा अंधारे यांनाही संधी दिली गेलेली नाही. एकूणच या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्रात बॅकफूटवर गेलेली दिसते. दोन वर्षानंतर राज्यसभेसाठी महाविकास आघाडी कडून आपला विचार केला जाईल या आशेवर काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते आहेत.
हेही वाचा
उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट
कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा