बॉलीवूड आणि अफेयर(relationship) याबद्दल वर्षानुवर्षे चर्चा होत असतात.अभिनेता दीपक पाराशर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे आणि अभिनेत्री झीनत अमान यांच्यातील कथित नात्यावर, तसेच झीनत आणि संजय खान यांच्या वादग्रस्त संबंधांवर भाष्य केले आहे. ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटातून दीपक पाराशर यांनी झीनत अमानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

अभिनेत्री झीनत अमान आणि दीपक पाराशर हे रिलेशनशिपमध्ये (relationship)असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. यावर दीपक पाराशर यांनी एका मुलाखतीत संजय खान व झीनत अमान यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले. याबरोबरच आजही झीनत अमान यांच्याबद्दल मनात भावना असल्याचे वक्तव्य केले.

दीपक पाराशर यांनी विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आणि झीनत यांच्या अफेअरच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “जेव्हा मी झीनतला भेटलो, तेव्हा ती तिच्या संजय खानसोबतच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर होती. ती बहुतेक आर्थिक अडचणींचा सामना करत होती, यामुळे ती त्रस्त होती. पाराशर यांनी कबूल केले की, ते झीनतचे खूप जवळचे मित्र होते. दीपक पाराशर यांच्या मते, त्यांच्या आणि झीनतच्या मैत्रीचा संजय खान यांनी चुकीचा अर्थ लावला. संजय खान यांना वाटले की, झीनत एकाच वेळी दोघांसोबत संबंध ठेवत आहे.

या गैरसमजातूनच तो वादग्रस्त प्रसंग घडला. झीनत अमान मुंबईला संजय खान यांना भेटायला गेली होती. दीपक सांगतात, “सकाळी ११ च्या सुमारास मुंबईहून फोन आला. तिथे त्यांच्यात भांडण झाले असेल. तिला ढकलण्यात आले किंवा मारहाण झाली. नेमकं काय झालं हे मला माहीत नाही.” झीनतने फक्त त्यांचे दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांना कळवले की तिला त्रास देण्यात आला आहे आणि ती जखमी झाली आहे. संजय खान आणि त्यांची पत्नीदेखील तिथे उपस्थित होते, असे तिने सांगितले.

झीनत अमान यांनी सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत संजय खान यांच्याबरोबर नात्यात असताना सार्वजनिकरित्या झालेल्या छळाबद्दल वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “मी त्या आठवणी पुसून टाकलेल्या आहेत, कारण मला वाटते की मानवी मन हे करू शकते. जेव्हा काहीतरी अप्रिय असते, तेव्हा मन असे भासवते की असे काहीच घडले नाही आणि तुम्ही स्वतःला वचन देता की ते पुन्हा कधीही होणार नाही.”

हृषिकेश कननला दिलेल्या मुलाखतीत संजय खान यांना झीनत अमान यांना झालेल्या दुखापतीबद्दल विचारले होते. तसेच, त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्याचा का उल्लेख केला नाही, याबद्दलही विचारले होते. यावर ते म्हणालेले, “गोष्टीची एकच बाजू ऐकून घेतली, मला त्याबद्दल काहीही विचारले नाही, हे खूप भीतीदायक आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्याविरुद्ध केलेली योजना होती. तिच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यासाठीसुद्धा मला जबाबदार धरले. तिला दिसत नसेल, तिला डोळा गमवावा लागत असेल तर ते वाईट आहे.”

हेही वाचा :

सलमान खानने मित्राच्या फॅशन शोमध्ये पहिल्यांदाच केला रॅम्प वॉक…
हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्माकडे ‘Good News’…
साजशृंगार केला, फुगे घेतले अन् क्रेनला लटकून कपलने केलं अनोखं शूट; Video Viral