मुंबई ड्रग्स के बाहो मे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

फार वर्षांपूर्वी “बंबई रात के राहो मे”हा एक हिंदी चित्रपट (Drugs) प्रदर्शित झाला होमध्यरात्रीची मुंबई नेमकी काय असते याचे भेदक चित्रण या चित्रपटात करण्यात आले होते. तिकीट खिडकीवर हा चित्रपट यशस्वी झाला होता. महाराष्ट्रातील आणि देशातील महानगरे ही आता ड्रग्सच्या विळख्यात सापडू लागली आहेत. अतिशय महागडे ड्रग्ज तरुणाईच्या हातामध्ये सहज येऊ लागले आहेत. अमली पदार्थांच्या विरोधात प्रस्थापित करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये शैथिल्य आल्यानंतर नेमके काय घडते हे नुकत्याच घडलेल्या नेस्को म्युझिक कॉन्सर्ट मुळे सहज लक्षात येऊ शकेल. अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग अर्थात नार्कोटिक्स डिपार्टमेंट मुंबईत आहे आणि ते करते काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.मुंबई महानगरात परदेशातून विविध प्रकारचे अतिशय महागडे नशिले पदार्थ रोज येत असतात.तसेच मुंबईतून इतर महानगरात पाठवले जात असतात. ही आवक आणि जावक इतक्या सहजपणे होत असते की, जणू काही हे नशिले पदार्थ वैधानिक आहेत असे वाटावे. काही ड्रग्स हे भारतामध्ये औषध कारखान्यांसाठी अत्यावश्यक असतात. प्रामुख्याने पेन किलर औषधे बनवण्यासाठी या ड्रग्जचा वापर केला जातोआणि त्यासाठी औषध कंपन्यांना रीतसर परवाना घ्यावा लागतो. या ट्रकचा हिशोब अत्यंत काटेकोरपणे लिहावा लागतो.

रीतसर परवान्याच्या माध्यमातून आयात केलेले ड्रग्ज अवैध (Drugs) कारणांसाठी वापरले जाते आहे काय यावर लक्ष ठेवणारी एक यंत्रणा असते. भारतामध्ये ड्रग्सच्या संदर्भात अतिशय कठोर कायदे आहेत, ड्रग्स च्या व्यवहारावर नियंत्रण करणारी एक यंत्रणा सुद्धा आहे पण तरीही हे पदार्थ तरुणाईसाठी सहज उपलब्ध होतात. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात मुंबईतील एका कॅसिनो मध्ये नार्कोटिक्स डिपार्टमेंट ने धाड टाकली होती. त्यामध्ये रेव पार्टीत सापडलेला शाहरुख पुत्र आर्यन खान हा जसा गाजला होता तसाच नार्कोटिक्स विभागाचे प्रमुख समीर वानखेडे हे सुद्धा अडचणीत आले होते.दिनांक 11 एप्रिल रोजी गोरेगाव येथील नेस्को म्युझिक कॉन्सर्ट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये सामील झालेल्या तरुणाईने एमडी तसेच एम ए नामक नशिल्या गोळ्यांचे सेवन केले होते. मुंबईतील बजाज इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा एक गट या पार्टीत सहभागी झाला होता. पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांनी मादक पदार्थांचे सेवन केले होते.

त्याचा अति डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण उघड झाले.(Drugs) या प्रकरणात आकाश सामल, आनंद पटेल व इतर काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नेस्को म्युझिक सेंटर मध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी आकाश सामल याला मिळाली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मद्य सेवन करणे, मद्य पुरवठा करणे याचे रीतसर परवाने मिळाले होते. अर्थात हे परवाने देता येतात का? प्रासंगिक कारणांसाठी परवाना देणे हे कायदेशीर आहे का? असा परवाना देण्याचे अधिकार कोणाला आहेत? आकाश सामंत किंवा आनंद पटेल यांच्यावर अशा प्रकारची मेहरबानी दाखवण्याची कारणे काय?दारूबंदी तथा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली होती काय? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात शिवसेनेच्या उबाठा गटाने काही प्रश्न उपस्थित करून गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली आहेत. आमदार सुनील प्रभू तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शासनाला तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असे स्पष्ट केले असले तरी, आयोजकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यापलीकडे काही घडलेले नाही.

वास्तविक ज्यांनी कोणी हे परवाने दिले होते त्यांना तातडीने सेवेतून (Drugs) निलंबित करणे गरजेचे होते. कदाचित चौकशीनंतर ते होईलही परंतु अमली पदार्थ विरोधी यंत्रणा अस्तित्वात असूनही तसेच या संदर्भातील कायदे अतिशय कठोर असूनही असे प्रकार घडतातच कसे? या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मिळत नाही.अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्ट पार्ट्या या अति श्रीमंत तरुणांच्या कडून आयोजित केल्या जातात. वास्तविक या रेव पार्टीच असतात. या पार्ट्यांमध्ये अतिशय महागडी ट्रक

विकली जातात. या पार्ट्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांना मोठ्या रकमेचे स्वागत शुल्क लावले गेलेले असते. गोरेगावच्या नेस्को म्युझिक सेंटर मध्ये आयोजित केलेल्या अशा प्रकारच्या पार्टीमध्ये मुंबईत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण आणि तरुणींचा प्रामुख्याने सहभाग होता. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या त्यामध्ये जास्त होती. या पार्टीमध्ये अमली पदार्थांचा अति डोस झाल्यामुळे दोघा जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीच्या कठोरातील कठोर उपाय योजना केल्या पाहिजेत. मुळातच मुंबईतील ड्रेस माफियांचे रॅकेट उध्वस्त केले पाहिजे. तरच हे शक्य होणार आहे.

हेही वाचा

लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक