पावसाळ्याचा(Rain) शेवटचा महिना सुरू असूनही कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने १ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज कोणताही अलर्ट नसल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

मुंबई व उपनगरातील वातावरण :
मुंबईत आज काही ठिकाणी हलक्या रिमझिम सरी(Rain) पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता नसल्यामुळे दैनंदिन जीवन व वाहतुकीवर फारसा परिणाम होणार नाही. दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून तापमान किमान २५ ते कमाल ३० अंश सेल्सियस दरम्यान राहील. वारे पश्चिम-दक्षिण-पश्चिमेकडून वाहणार असून त्यांचा वेग सुमारे ८ ते १२ किमी प्रती तास राहील.
नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. दुपारनंतर हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येथे तापमान किमान २४ अंश सेल्सियस तर कमाल २९ अंश सेल्सियसपर्यंत जाणार आहे. वारे पश्चिमेकडून वाहतील व वेग १० ते १५ किमी प्रती तास असू शकतो.
पालघर व कोकणातील परिस्थिती :
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा नाही. मात्र किनारी भागात हलक्या सरींची शक्यता आहे. येथे किमान तापमान २५ आणि कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस असेल. वारे पश्चिमेकडून वाहतील आणि त्यांचा वेग १० ते १८ किमी प्रती तास असू शकतो. समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आजही यलो अलर्ट कायम आहे. या भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहणार असून दुपारनंतर अधूनमधून मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तापमान २४ ते ३० अंश सेल्सियस दरम्यान राहील. वारे पश्चिम-दक्षिण-पश्चिमेकडून वाहतील व त्यांचा वेग १५ ते २० किमी प्रती तास असण्याची शक्यता आहे. पावसामुळे काही ग्रामीण भागांत पाणी साचण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड…
आज अनेक शुभ योग; ‘या’ 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस…
“आजपासून पाणीही पिणार नाही…”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा