कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकीय(political) नात्यांचा उत्सव काही वेगळाच असतो. तो कधी रक्ताचा तर कधी मतांचा! कधी मैत्रीचा तर कधी शत्रुत्वाचा, कधी मित्र बदलण्याचा तर कधी शत्रू बदलण्याचा असतो. राजकारण बदलले, संदर्भ बदलले तर नात्यांचा उत्सवही प्रसंगोपात बदलतो. हे बदल पाहून सर्वसामान्य माणूस अक्षरशः चक्रावून जातो. अरे! हे तर काल-परवापर्यंत एकमेकांना”पाण्यात”पहात होते आणि आज आपण एक आहोत असे सांगत सुटले आहेत. अशा प्रतिक्रिया याच सामान्य माणसाच्या असतात.

सहकारात राजकारण(political) आणू नका किंवा सहकारापासून राजकारण दूर ठेवा असे सांगितले जात असले तरी सहकार क्षेत्र हे राजकारणी मंडळींच्या हातात आहे. आणि आपले राजकारण सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडून सहकाराचा वापर सहजपणे केला जातो. त्यामुळे सहकारी संस्थांपासून राजकारण कधीच अलिप्त राहू शकत नाही. सुमारे 4000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा ही त्याला अपवाद नाही.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ ही व्यापारी सहकारी संस्था गेल्या काही वर्षांपासून महादेवराव महाडिक यांच्या हुकूमतीखाली होती. त्यांच्या हातातून ही संस्था काढून घेण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विद्यमान आमदार सतेज पाटील, विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ या दोघांनी एकत्र येऊन केलेल्या आटोकाट प्रयत्नाना चार साडेचार वर्षांपूर्वी यश आले आणि ही महत्त्वाची संस्था महाडिक गटाच्या हातातून निसटून गेली.
काही महिन्यांपूर्वी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे होते आणि त्यांना सतेज पाटील यांनी अध्यक्ष पदावर विराजमान होण्याची संधी दिली होती. सतेज पाटील यांना त्यांच्या आणखी एका संचालकाला अध्यक्षपदाची संधी द्यावयाची होती म्हणूनच त्यांनी व हसन मुश्रीफ यांनी डोंगळे यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते पण त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. ही संधी साधून गोकुळच्या सत्ताकारणात महायुतीच्या बड्या नेत्यांनी विशेषतः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी हस्तक्षेप केला.
मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ त्यांच्यावर दुग्धाभिषेक करून त्यांना गोकुळचे अध्यक्ष बनवले. आणि ही संस्था महायुतीच्या कब्जात आली. गोकुळचे राजकारण(political) बदलले. चार साडेचार वर्षांपूर्वी राज्याच्या तत्कालीन राजकारणानुसार गोकुळ वर महाविकास आघाडीचे अप्रत्यक्षरीत्या वर्चस्व होते. या आघाडीत सतेज पाटील आणि मुश्रीफ हे दोघेही मंत्री होते. अडीच तीन वर्षांपूर्वी अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पाडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलले.
गोकुळ दूध संघातील सत्ता कारणावरही त्याचा परिणाम झाला आणि या दूध संघात सतेज पाटील एकाकी पडले आणि सर्व सूत्रे हसन मुश्रीफ यांच्याकडे आली. त्यांचे चिरंजीव नवीद हे अकल्पितपणे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष बनले. या दूध संघात प्रबळ विरोधी संचालक म्हणून शौमिका महाडिक यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले होते. संघातील मनमानी कारभारावर त्या अतिशय मोठ्या आवाजात बोलू लागल्या होत्या. पण हा दूध संघ महायुतीकडे गेल्यानंतर
त्यांची पंचाईत झाली. कारण महाडिक कुटुंब, शौमिका यांचे पती अमल महाडिक हे भारतीय जनता पक्षात आहेत. या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी आता विरोधकाची भूमिका सोडावी आणि आमच्या बरोबर यावे असे आवाहन नवीद मुश्रीफ यांनी त्यांना केले आहे.

म्हणजे चार साडेचार वर्षांपूर्वी महाडिक गटाच्या हातातून गोकुळ दूध संघाची सत्ता गेल्यानंतर शौमिका महाडिक यांनी गोकुळ मध्ये प्रबळ विरोधी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आणि आता एका अर्थाने त्या सत्ताधारी गटात गेल्यामुळे त्यांनी आता गोकुळचे सत्ताधारी म्हणून बोलावे अशी अपेक्षा विद्यमान अध्यक्षांची आहे.
काही महिन्यापूर्वी पर्यंत शौमिका महाडिक यांच्यासाठी नवीद मुश्रीफ हे विरोधक होते. आता इथले राजकीय संदर्भ बदलून गेल्यामुळे महाडिक गट अप्रत्यक्षपणे गोकुळ दूध संघाच्या सत्तेत आलेला आहे. म्हणजे कालचे शत्रू आजचे मित्र बनले आहेत.
गंमत अशी की सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ महाडिक यांच्याकडून काढून घेतला होता आणि आता अप्रत्यक्षपणे या संघात महाडिक सत्तेच्या पटलावर आलेले आहेत आणि सतेज पाटील हे सत्ताबाह्य झालेले आहेत.
अरुण कुमार डोंगळे यांनी अलिखित कराराप्रमाणे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असता तर गोकुळ मधील सत्ताकारण बदलले नसते. आणि म्हणूनच राजकीय नात्यांचा उत्सव कसा वेगळ्या प्रकारे असतो हे सर्वसामान्य जनतेला या निमित्ताने पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा :
दिवाळीपर्यंत सोने, चांदी स्वस्त होणार की महाग?
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती
विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात मुली? 5 महत्त्वाची कारणे