तोची एक प्रश्न खरा !

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

मध्य पूर्वेत सध्या शस्त्र संधी असली तरी, ती हंगामी स्वरूपाची आहे.(indeed) त्यामुळे सध्या दिसत असलेली शांतता ही वादळापूर्वीची ठरू शकते. पुन्हा युद्धाचा भडका उडाला तर जगातील विकसनशील देशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. जगावर भयंकर बेरोजगारीचे संकट येणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे तर करोडो लोक गरिबीच्या गर्तेत लोटले जातील असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाने दिला आहे. आणखी आठ दिवसानंतर शस्त्रसंधी संपणार आहे. त्यानंतर काय होईल? या एकाच प्रश्नाने पश्चिम आशियातील सर्वसामान्य लोक हैरान झाले आहेत. हार्मोझची सामुद्रधुनी आणि इराणूचा अणू कार्यक्रम हे दोन विषय कळीचे मुद्दे बनलेले आहेत. चाळीस दिवस चाललेल्या युद्धात अगदी पहिल्या दिवशी इराणचा अणू कार्यक्रम हा विषय इजराइल अमेरिकेने रडारवर घेतला होता. आणि शस्त्रसंधी होण्याच्या आधी काही दिवसbहार्मोझची सामुद्रधुनी हा आयत्या वेळचा विषय रडावर आणला गेला होता.युद्धाच्या चाळीसाव्या दिवशी दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी मान्य करण्यात आली. पण ती केवळ दोन आठवड्यांची आहे. ती अनिश्चित काळापर्यंत पुढे जाण्याच्या हेतूने पाकिस्तानच्या इस्लामाबाद मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी झाल्या 21 तास चर्चा झाली, पण दोन्ही बाजूंनी विषय ताणला गेला. अमेरिकेने इराणच्या अटी आणि इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. त्यामुळे जगाचे लक्ष वेधून राहिलेल्या या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही.

आमच्या सामुद्रधुनीतून जलवाहतूक करण्यासाठी आम्ही (indeed) सर्वच देशांकडून टोल आकारणार, अशी हट्टाग्रही भूमिका इराणने घेतली, आणि ती अमेरिकेने अमान्य केली. आमचा अणू कार्यक्रम हा विकासासाठी आहे. तो आमचा अधिकार आहे आणि म्हणूनच तो मागे घेणार नाही. युरेनियम चे साठे नष्ट करणार नाही. ही इराणची भूमिका अमेरिकेला मान्य नाही. सामुद्रधुनी इतर देशांच्या जहाज वाहतुकीसाठी आम्ही खुली करणार असे अमेरिकेने जाहीरपणे सांगितल्यानंतर आता हा तणाव वाढला आहे. अर्थात अमेरिकेच्या या कृतीला त्यांचे मित्र असलेल्या देशांनी समर्थन दिलेले नाही. पण आता सामुद्रधुनी हा विषय अमेरिकेने प्रतिष्ठा केला आहे. याच एका प्रश्नावरून अमेरिकेकडून युद्धाचा पुन्हा भडका उडू शकतो. त्यामुळे पश्चिम आशियातील देश आणि संयुक्त राष्ट्र संघ सुद्धा चिंतेत पडला नाही तरच नवल. शस्त्र संधी उठल्यानंतर नेमके काय होणार या एकाच प्रश्नाने सर्वसामान्य जनतेच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. युद्धामुळे खतांचा पुरवठा आणि जागतिक जहाज वाहतुकीवर गंभीर परिणाम होतील त्यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात येईल.

असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाच्या एका समितीने तज्ञांचा हवाला देऊन दिला आहे. (indeed) युद्धाचा भडका उडाला तर साडेतीन कोटी पेक्षा अधिक लोक नव्याने गरिबीला सामोरे जातील. विकसनशील देशातील 80 कोटी रोजगारांची तूट निर्माण होणार आहे.सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय करारामुळे सौदीच्या मदतीसाठी पाकिस्तानने 12 हजार सैनिक पाठवले आहेत. या कृतीमुळे इरांणकडून पाकिस्तान वर हल्ले होऊ शकतात. तसे झाले तर युद्धाची व्याप्ती वाढू शकते.
आणि म्हणूनच आणखी आठ दिवसानंतर काय होणार या एकाच प्रश्नाने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे.चाळीस दिवसांच्या युद्धात भारताने घेतलेल्या भूमिकेचे इराण कडून स्वागत करण्यात आले आहे. आय लव यू इंडिया, थँक्यू इंडिया,
थँक्स फॉर इंडियन पीपल अशी लिखित स्वरूपात प्रतिक्रिया इराणने दिली आहे. भारतीय जहाजांना इराणकडून आत्तापर्यंत टोल आकारलेल्या नाही आणि भविष्यातही तीच भूमिका इराणची असेल असे इराणच्या मुंबईच्या राजदूत कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात त्यासाठी दोन्ही देशांकडून चर्चा होईल.

भारतासाठी ही आशादायक बाब मानली पाहिजे. भारताच्या परराष्ट्र (indeed) धोरणावर सातत्याने टीका करणाऱ्यांना इराणकडूनच अप्रत्यक्षपणे उत्तर मिळालेले आहे.ज्याचे युद्ध हे उत्तर येत नाही, त्या प्रश्नाच्या प्रतीक्षेत भारतासह पश्चिम आशियातील सर्व देश आहेत. सध्या किंवा गेल्या दीड दोन महिन्यापासून इजराइल अमेरिका आणि इराण यांनी जे प्रश्न उपस्थित
केले आहेत त्याला त्यांनी युद्ध हेच उत्तर दिले आहे. लोकांना मात्र युद्ध हेच उत्तर असलेले प्रश्न नको आहेत किंवा ते वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजेत असे वाटते आहे. पण त्यासाठी संबंधितांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. पण ते वाटाघाटीच्या पातळीवर येतील काय? तोची खरा एक प्रश्न आहे.

हेही वाचा

१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?

अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर