पाकिस्तानला पुन्हा एकदा दहशतवादी(Terrorists) हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानच्या दक्षिण वाजिरीस्तान या भागात दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. बॉम्ब ब्लास्ट करत सैनिकांची बस उडवून दिली आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 12 सैनिक ठार झाले आहेत.

पाकिस्तानच्या दक्षिण वाजीराबाद येथे टीटीपी संघटनेच्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. त्यांनी सैनिकांच्या ताफ्यावरच हल्ला केला आहे. दक्षिण वाजिरीस्तानच्या बादर घाटीमध्ये सैनिकांच्या ताफ्यावर हा भीषण हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी(Terrorists) बॉम्ब ब्लास्ट केला आहे. यामध्ये जवळपास 12 सैनिक ठार झाले आहेत.

या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांना जवळील रोगणलयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला एकदम नियोजनबद्ध करण्यात आला आहे. हा हल्ला इतका वेगवान आणि भीषण होता की, सैनिकांना प्रत्युत्तर देण्यास देखील वेळ मिळाला नाही, असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे.

पाकिस्तानी तालिबान TTP संघटनेने घेतली आहे. आम्ही सैनिकांच्या हातातील शस्त्रे देखील हस्तगत केल्याचे या संघटनेने सांगितलेले आहे. दक्षिण वाजिरीस्तान या भागात गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता वाढत आहे. प्रशासनाने येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच कोणतीही संशयासस्पद हालचाल दिसल्यास आम्हाला संपर्क करावा, असे सांगितले.

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर या चकमकीत 3 जवान जखमी झाले आहेत.

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन गुड्डर सुरू केले आहे. दरम्यान या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाल्याचे देखील समजते आहे. तसेच 3 जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे. कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

भारतीय लष्कराने गुड्डर जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. संपूर्ण जंगलाला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. मोठ्या प्रमाणात सैनिक या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत आहेत. दरम्यान कंठस्नान घातलेला एक दहशतवादी सुरक्षा दलांच्या हीटलिस्टमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमध्ये मोठे ऑपरेशन हाती घेतले आहे. दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

‘त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर…’; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

नेमकं विक्की जैनला झालं तरी काय? डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताला फ्रॅक्चर