भारताचा चीनला इतिहासातील सर्वात मोठा दणका, थेट वाढली चिंता, हिंद महासागरावर..

मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (global climate) इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष कमी होण्याऐवजी अधिक तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या अलीकडील चर्चांनाही ठोस यश मिळाले नसल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. इराणने स्पष्टपणे अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेच्या टेबलावर बसण्यास नकार दिल्यानंतर अमेरिका अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे संकेत आहेत.

या तणावाचा सर्वात मोठा परिणाम होर्मुज सामुद्रधुनी येथे दिसून येत आहे. जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही सामुद्रधुनी सध्या संघर्षाचे केंद्र बनली आहे. इराणकडून या मार्गावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न आणि अमेरिकेकडून वाढती नाकेबंदी यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल सतर्क झाले असून त्यांनी आपली सागरी सुरक्षा रणनीती अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल डी. के. त्रिपाठी यांनी जाहीर केलेल्या या नव्या रणनीतीत होर्मुज सामुद्रधुनीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. याशिवाय जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यावश्यक असलेल्या इतर सागरी मार्गांवरही भारताने लक्ष केंद्रीत केले आहे.

या महत्त्वाच्या मार्गांमध्ये केप ऑफ गुड होप, मोझांबिक चॅनल, बाब-अल-मंडेब सामुद्रधुनी, सुएझ कालवा तसेच मलाक्का सामुद्रधुनी आणि सिंगापूर सामुद्रधुनी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुंडा सामुद्रधुनी चा उल्लेख केल्याने चीन ची चिंता वाढल्याचे मानले जात आहे.

मलाक्का आणि सिंगापूर सामुद्रधुनी या हिंद महासागराला दक्षिण चीन समुद्राशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या दुव्यांपैकी आहेत. पर्शियन आखातातून पूर्व आशियात जाणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यासाठी हा सर्वात लहान आणि अत्यावश्यक मार्ग मानला जातो. त्यामुळे या मार्गांवरील कोणताही तणाव जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करू शकतो.

दरम्यान, सुंडा सामुद्रधुनीत भारताची वाढती उपस्थिती ही चीनसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. हिंद महासागरातील वाढत्या सामरिक स्पर्धेमध्ये भारताने आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी सामरिक पातळीवरील स्पर्धा अद्याप कायम आहे.

तज्ज्ञांच्या मते, होर्मुज सामुद्रधुनीत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भारतासह अनेक देश पर्यायी मार्ग, साठवणूक आणि सागरी सुरक्षा यावर गंभीरपणे विचार करत आहेत. जागतिक तणावाच्या या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

आप पक्षाला मोठा धक्का राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक

 27 एप्रिलला सर्वात दुर्मिळ योग, 3 लकी राशींचं नशीब फळफळणार, पैशांचा पाऊस पडणार?