मोठा राजकीय भूकंप? भाजपची मोठी खेळी; शरद पवारांना धक्का बसणार

साताऱ्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.(earthquake) भाजपने साताऱ्यात मोठी खेळी केली आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि औंध संस्थानाच्या राणी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी भाजपच्या वाटेवर आहेत. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल आणि साताऱ्यामध्ये भाजपची ताकद वाढेल.

मिळालेल्या माहितीनुसार, औंध संस्थानाच्या राणी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी (earthquake)या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या संभाव्य पक्षांतरामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या कैलासवासी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. भाजपमध्ये जाण्याबाबत त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (earthquake)निवडणुकांमध्ये गायत्रीदेवी यांनी राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी मोठा धक्का राहिल.

गेल्या काही काळापासून स्थानिक पातळीवर आणि पक्षांतर्गत महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांना विश्वासात घेतले जात नसल्याची चर्चा आहे. विकासकामांच्या मुद्द्यावरूनही त्या नाराज होत्या अशी देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये त्यांना सातारा जिल्ह्यात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यानंतर आता संस्थांनिकांच्या वारशातील आणखी एक मोठे नाव भाजपसोबत आल्यास साताऱ्यामध्ये भाजपची पकड आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला

 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर

AIमुळे बँकांमध्ये नोकर कपात? जगावर बेरोजगारीचं सावट