गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमणुकीमुळे मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा राजकीय धक्का बसला असून महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि महाडिक गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावरील (गोकुळ) प्रशासक नियुक्तीची कारवाई हा महायुतीत असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का आहे. संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्यांच्यासह महायुतीच्या अन्य नेत्यांनी भाजप आणि पर्यायाने महाडिक गटासोबत ठेवलेला दुरावा नडल्याचे बोलले जाते.राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर ‘गोकुळ’मध्ये काय होणार, याची उत्सुकता होती; (Gokul Milk) पण त्याचवेळी मंत्री मुश्रीफ यांच्याकडून महायुती म्हणूनच आम्ही संघाची निवडणूक लढविणार, असा दावा केला जात होता. या महायुतीत मंत्री मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षांसह भाजप, शिवसेना शिंदे पक्ष व ‘जनसुराज्य’ शक्ती एकत्र आहेत.
संघात भाजपकडून खासदार धनंजय महाडिक, शिवसेना शिंदे पक्षांकडून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक व ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे नेतृत्व करतात. ज्यावेळी मंत्री मुश्रीफ हे महायुती म्हणूनच ‘गोकुळ’ लढणार असे वारंवार सांगत होते, त्याचवेळी महायुतीतील अन्य नेत्यांची भूमिका ही ‘नरो वा कुंजरोवा’ अशीच होती. (Gokul Milk) त्यामुळे या नेत्यांनीही थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले.दुसरीकडे महायुतीत भाजप आणि ‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक यांचे वर्चस्व असून, या दोघांना चर्चेत डावलण्यात आले. पहिल्यापासूनच मंत्री मुश्रीफ यांनी भाजपसह महाडिक यांच्याशी चर्चा केली असती, तर कदाचित आजची वेळ संघावर आली नसती.
कोणत्याही परिस्थितीत संघावर प्रशासक येऊ नये, यासाठी मंत्री मुश्रीफ हे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होते. आजही त्यांनी आमदार डॉ. कोरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे टाळण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. गेले महिनाभर जी शिष्टमंडळे मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटली, त्यानंतर महायुतीचे नेते म्हणून पालकमंत्री आबिटकर, डॉ. कोरे किंवा प्रा. संजय मंडलिक हे मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत प्रत्यक्षात नव्हतेच, असेही या कारवाईवरून दिसते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी मुश्रीफ यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मुश्रीफ आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच तक्रारी केल्याचे समजते. या चर्चेत करवीर, राधानगरी व कागलमध्ये राष्ट्रवादीच आपल्या विरोधात असल्याची तक्रार आबिटकर यांनी केल्याचे समजते. एवढेच नव्हे तर लोकसभा, विधानसभेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शिवसेना शिंदे पक्षाला मदत केल्याचा दावाही आबिटकर यांनी केल्याची चर्चा आहे.(Gokul Milk) त्यामुळे त्यांना वगळून ‘गोकुळ’ची निवडणूक लढू नये, असा सूर महायुतीतील अन्य नेत्यांचा होता. त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
एका ज्येष्ठ संचालकांनी संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी नेत्यांना भेटण्याची टूम काढली. त्यामागे महायुती म्हणून सगळे एकत्र आले, तर आपलाच पत्ता कापला जाईल ही भीती संबंधित संचालकांना होती. या भेटीही महाडिक यांना वगळूनच झाल्या. संघात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हेही नेतृत्व करतात, त्यांची भेट मात्र टाळण्यात आली. या भेट राजकारणाचाही उलटा परिणाम झाल्याचे दिसून येते.संघाच्या संस्थाविरोधात प्रकाश बेलवाडे न्यायालयात गेल्यानंतर त्यांना महायुतीतूनच बळ देण्यात आले. या न्यायालयीन प्रक्रियेत शेवटच्या टप्प्यात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी उडी तर घेतलीच; पण त्यांनी थेट मंत्री मुश्रीफ यांच्यावरच हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. आमदार पाटील व मुख्यमंत्री फडणवीस
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?