नुकताच प्रेमानंद जी महाराज(Maharaj) यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट @bhajanmarg_official वरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महाराजांची तब्बेत खूपच खराब दिसत असून भक्त भावूक झाले आहेत. महाराज भक्तांना प्रवचन देत असूनही त्यांचे डोळे मात्र उघडू शकत नाहीयेत. त्यांचा चेहरा सुजला असून संपूर्ण लाल झाल्याचे दिसून येत आहे आणि इतकंच नाही तर बोलताना आवाजही कापत आहे. यामुळे भक्तांना त्यांची चिंता वाटू लागली आहे.

व्हिडिओमध्ये महाराज(Maharaj) म्हणतात की, ‘ही एक सवय झाली आहे. आपल्याला कितीही त्रास झाला तरी ही प्रथा जात नाही. जोपर्यंत आपण आपल्या देवतेचे स्मरण करत नाही तोपर्यंत आपल्याला शांती मिळत नाही. देव तुमच्या कष्टाने प्रसन्न होतो, तुमच्या आळशीपणाने नाही.’ हे शब्द ऐकून सोशल मीडियावरील लोक भावुक झाले आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले. भक्तांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे आणि म्हटले आहे की त्यांना या अवस्थेत पाहून दुःख होतंय. त्यांचे म्हणणे आहे की त्यांचा चेहरा पाहून हृदयात नेहमीच आनंद होतो, परंतु आज त्यांना असे पाहून डोळ्यांत अश्रू येत आहेत. प्रेमानंद महाराजजींना काय झाले आहे आणि कोणत्या आजारामुळे त्यांची स्थिती निर्माण झाली आहे ते जाणून घेऊया.
वृंदावनमधील प्रसिद्ध संत बाबा प्रेमानंद जी महाराज यांना पॉलिसिस्टिक किडनीचा आजार आहे आणि हा आजार अनुवंशिक आहे. यामध्ये हळूहळू किडनी काम करणे बंद करते. या आजाराबाबत प्रेमानंद महाराज यांना खूप वर्षापासून माहीत आहे आणि त्यांच्या दोन्ही किडनीमध्ये हा त्रास असून अनेकांनी त्यांना आपली किडनी दान करण्याबाबतही विचारले होते, यामध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचाही समावेश होता.

प्रोफेसर डॉ. बी.पी.एस. त्यागी यांच्या मते, एकदा प्रेमानंदजींना पोटदुखीचा त्रास झाला, म्हणून ते दिल्लीतील डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि त्यांना जगण्यासाठी फक्त दोन ते अडीच वर्षे उरली आहेत. पण हे ऐकूनही महाराज निश्चिंत राहिले. त्यांनी हे सकारात्मकपणे स्वीकारले आणि म्हणाले की आयुष्यात जे काही घडते ते देवाची इच्छा असते.
हेही वाचा :
भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडून मोठा छळ….
अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं…बैठकीत नेमकं काय घडलं?
डी के एस सी मध्ये अभिजात मराठी भाषा दिवस संपन्न…