२०२० या वर्षाने संपूर्ण जगाला कोरोना महामारीच्या महासंकटात ढकलले. पुढील दोन-तीन वर्षे या विषाणूने समस्त मानवजातीला वेठीस धरले. कोरोनाचा हल्ला केवळ मानवी शरीरावरच नव्हता, तर जगण्याचे सगळे सूत्रच बदलून टाकणारा ठरला. जग ‘लॉकडाउन’ झाल्यामुळे बंदिस्त घरात कोंडलेल्या प्रत्येकासाठी ‘स्मार्टफोन’ हाच एकमेव आधार बनला. या संपूर्ण परिस्थितीचा सर्वाधिक आणि गंभीर फटका बसला तो लहान मुलांना; कारण त्यांची हसती-खेळती शाळा सुटली आणि मित्रांसोबतचा संवादही केवळ मोबाईल स्क्रीनपुरता मर्यादित राहिला. हळूहळू कोरोनाचा विळखा तर संपला, पण लहान मुलांना ‘स्मार्टफोनचा नवा विळखा’ बसला. प्रत्येक गोष्ट मोबाईलवरच पाहण्याचा एक घातक ट्रेंड सुरू झाला. मुलांमध्ये ‘रील्स’ (Reels) पाहणे हे एका नवीन ‘जंक फूड’सारखेच झाले आहे. रील्सच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर कमालीचा विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनांमध्येच स्पष्ट झाले आहे.

लहान मुलांवर रिल्सचा नेमका कसा परिणाम होतो
निओनेटोलॉजिस्ट डॉ. अविजीत प्रकाश यादव यांच्या मते, मोठ्या प्रमाणावर रिल्स पाहिल्यामुळे आपल्या मेंदूला अत्यंत छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये माहिती घेण्याची सवय जडत आहे. (Corona pandemic) यामुळे आपल्याला थांबून, विचार करून गोष्टी सखोलपणे समजून घेण्यासाठी वेळच मिळत नाही. या सवयीचा थेट आणि वाईट परिणाम आपल्या एकाग्रतेवर, स्मरणशक्तीवर आणि ज्या कामांमध्ये संयम किंवा सतत विचार करण्याची गरज असते, अशा गोष्टींवर होत आहे.
खरं तर ही समस्या सर्वच वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे, परंतु लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे. आजची मुले अगदी लहान वयातच स्क्रीनच्या जगात मोठी होत आहेत. त्यांचा मेंदू अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे, विशेषतः मेंदूचा तो भाग जो एकाग्रता, भावनांवर नियंत्रण आणि काहीतरी नवीन शिकण्याशी संबंधित असतो. (Corona pandemic) जेव्हा मुले सतत वेगाने बदलणारा कंटेंट पाहतात, तेव्हा स्क्रीनवरील प्रत्येक स्वाइपसोबत त्यांच्या मेंदूला ‘डोपामाइन’ नावाच्या रसायनाचा झटपट डोस मिळतो. हे रसायन आनंद आणि सवय निर्माण करण्याशी संबंधित आहे. हळूहळू मेंदूला या वेगवान मनोरंजनाची चटक लागते. परिणामी, अभ्यास करणे, पुस्तके वाचणे किंवा सामान्य गप्पा मारणे यांसारख्या दैनंदिन गोष्टी त्यांना कंटाळवाण्या आणि निरस वाटू लागतात.शॉर्ट-फॉर्म कंटेंटची तुलना मेंदूसाठी असणाऱ्या ‘जंक फूड’शी केली जाते. कारण जंक फूड खाताना त्या क्षणाला खूप छान वाटतं, पण त्याचा अतिवापर मेंदूच्या संथ आणि अधिक अर्थपूर्ण गोष्टी सहन करण्याच्या क्षमतेला हळूहळू कमी करून टाकतो.
पालकांनी कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये?
मोबाईल स्मार्टफोनमुळे मुलांच्या वर्तनामध्ये बदल होतो. पालकांनी खालील बदलांकडे दुर्लक्ष करू नये
मूल फोनशिवाय अस्वस्थ होत असेल.
गृहपाठ करण्यासाठी एका जागेवर बसू शकत नसेल,
वारंवार गोष्टी विसरत असेल.
बाहेर खेळण्यात आणि लोकांमध्ये मिसळण्यात त्याची आवड संपली असेल.
हे सर्व अनहेल्दी स्क्रीन टाईम किंवा इंटरनेटच्या व्यसनाचे संकेत असू शकतात.
गॅजेट्स हिरावून घेण्याऐवजी साधा योग्य समन्वय
या समस्येवर उपाय म्हणजे मुलांवर पूर्णपणे स्क्रीन बंदी घालणे हा नाही, योग्य संतुलन निर्माण करणे हा आहे. मुलांच्या निरोगी मानसिक विकासासाठी आणि भावनिक स्वास्थ्यासाठी त्यांनी कधीकधी शांत बसणे किंवा ‘बोर’ होणेही गरजेचे आहे.(Corona pandemic) त्यांना पुस्तके वाचण्यासाठी, मैदानी खेळ खेळण्यासाठी, नवीन छंद जोपासण्यासाठी, पुरेशी झोप घेण्यासाठी आणि कोणत्याही अडथळ्याविना विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे; कारण हे सर्व अनुभव त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी