उत्तर प्रदेशमध्ये विवाहित महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात ही घटना घडली. हात-पाय बांधून नंतर तोंडात कापडचा बोळा कोंबून महिलेची हत्या करण्यात आली. घरामध्येच संशयास्पद अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. (woman) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रहरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोरारा गावात ही घटना घडली. या गावात राहणाऱ्या कन्हैयाची बायको जावत्रीची हत्या करण्यात आली. घरातील खाटेजवळ तिचा मृतदेह आढळून आला. (woman) हात-पाय बांधून आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिची हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावर अनेक जखमा देखील दिसून आल्या. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. शेजारी राहणारी महिला जावत्रीच्या घरी दूध देण्यासाठी आली होती तेव्हा ही घटना उघडकीस आली.दूध देण्यासाठी आलेल्या शेजारच्या महिलेने जावत्रीला आवाज दिला. बराच वेळ आवाज देऊन देखील तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. दरवाजा काही उघडला जात नसल्यामुळे शेजारी राहणाऱ्या महिलेला संशय आला. तिने शेजारी काही नागरिकांना बोलावून घेतलं. ते घराच्या छतावर चढले आणि त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्यांना जावत्री जमिनीवर पडलेली दिसली. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील दृश्य पाहून पोलिसही हादरले. या महिलेची हत्या जवळच्या व्यक्तीने केली की कुणी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून हे भयंकर कृत्य केले याचा तपास पोलिस करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कसून तपास सुरू केला. जावत्री घरामध्ये एकटीच राहत होती. तिला मुलं नव्हती. गेल्या ५ वर्षांपूर्वी तिने आपल्या छोट्या भावाच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. पण कौटुंबीक वादातून मुलीला परत देण्यात आले. त्यानंतर तिने आपल्या मामाच्या मुलाच्या एका मुलाला दत्तक घेतलं होतं. गावातील लोकांचे म्हणणे आहे की, जावत्री घरामध्ये नेहमी एकटीच असायची. तिच्या घरातील कौटुंबीक वाद नेहमी समोर यायचा.
जावत्रीचे दोन लग्न झाले होते. पहिले लग्न गंगेश्वरी गावात राहणाऱ्या देवदत्त यांच्यासोबत झाले होते. पण मुलं होत नसल्यामुळे त्यांचे लग्न तुटले.(woman) त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दुसरं लग्न लावून दिलं. बुलंदशहरच्या खुर्जा गावात राहणाऱ्या कन्हैयासोबत त्यांच्या लग्न झाले होते पण ते देखील टिकले नाही. शेवटी तिच्या आई-वडिलांनी पोरारा गावात एक वेगळं घर बांधून त्यांना दिले होते. त्यात ती ऐकटी राहत होती. जावत्रीच्या हत्येमुळे गावात खळबळ उडाली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
हेही वाचा
जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात
ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?