महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर सूचना समोर आली आहे.(holders)राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून मिळणारे मोफत धान्य जर अवैधरित्या विक्री करताना कोणी आढळले, तर त्यांचे रेशन कार्ड थेट रद्द करण्यात येणार आहे. अकोल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी यासंदर्भात इशारा दिला आहे.राज्यात 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना शिधावाटप दुकानांमार्फत स्वस्त धान्य पुरवले जाते. परंतु, काही रेशन कार्ड धारक मिळालेलं धान्य व्यापाऱ्यांना विकत असल्याचे तक्रारीतून उघड झालं आहे. हे अत्यंत गंभीर आहे, कारण सार्वजनिक वितरण प्रणालीचा हेतू गरजू कुटुंबांपर्यंत अन्न पोहोचवणे हा असून, त्याचा व्यावसायिक गैरवापर निषेधार्ह आहे.

काय होणार नियमभंग केल्यास? :
– शिधापत्रिकाधारक जर मोफत धान्य विकताना आढळले,(holders) तर त्या कुटुंबाचे नाव लाभार्थी यादीतून काढले जाईल.
– संबंधिताचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल.
– धान्याची अवैध साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील
– हे नियम राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत लागू असलेल्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांच्यावर लागू होतील.
– अंत्योदय योजनेत: 35 किलो गहू व तांदूळ — दर: ₹2–₹3 प्रति किलो
– प्राधान्य कुटुंब योजनेत: प्रतिमाणसी 3 किलो गहू + 2 किलो तांदूळ — दर: ₹2–₹3 प्रति किलो
– प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना: प्रतिमाणसी 5 किलो अन्नधान्य पूर्णतः मोफत+ दरमहा एक किलो डाळ तूर किंवा चणाडाळ
शिधापत्रिका धारकांनी मिळालेलं धान्य स्वतःच्या कुटुंबाच्या वापरासाठीच वापरावं. (holders)ते विकल्यास नुकसान फक्त स्वतःलाच होणार आहे. तसेच, शासनाच्या योजनेचा गैरवापर झाल्यास इतर गरजू कुटुंबांचा हक्क हिरावला जाईल, हेही लक्षात ठेवा.
हेही वाचा :
सिंधू पाणी करार : पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका!
राज-उद्धव एकत्र… शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा!
बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! रुग्णालयाबाहेरील Video समोर