कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

पुणे येथील जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील महार वतनी जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्यामुळे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत. या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी अतिशय(Water) गांभीर्याने दखल घेतली आहे आणि आता त्याची रीतसर चौकशी सुरू होईल. देवेंद्र फडणवीस यांनी जो न्याय एकनाथ खडसे यांना दिला होता तोच न्याय या प्रकरणात दिला जाईल काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.पुणे शहर परिसरात सुमारे तीन एकर जमिनीवर असलेले जैन मंदिर आणि जैन विद्यार्थी बोर्डिंग हे विशाल गोखले या बिल्डरला 231 कोटी रुपयांना बोर्डिंगच्या विश्वस्तांनी विकले होते. गोखले यांच्या कंपनीत भागीदार असलेले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे या खरेदी व्यवहारात चांगलेच अडचणीत आले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एक नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे जमीन खरेदी विक्री प्रकरण बाहेर काढले होते.

जैन बोर्डिंग ची ही जमीन अडीच हजार कोटी रुपयांच्या किमतीची होती आणि आहे. पण ती केवळ 231 कोटी रुपयांना विकण्यात आली होती. आता हा व्यवहार रद्द झाला आहे. पण प्रकरण अद्यापही ताजे आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे प्रकरण वादग्रस्त व्यवहार म्हणून पुढे आले आहे.औद्योगिक कारणासाठी शेतकऱ्यांच्याकडून काढून घेतलेली चाळीस एकर जमीनअजित दादा यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी त्यांच्या कंपनीसाठी खरेदी केली आहे. 1800 कोटी रुपये किमतीची ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांत त्यांच्या कंपनीने विकत घेतलेली आहे. शेतकऱ्यांची जमीन शासनाने घेतली आणि शासनाकडून कवडीमोल किमतीत ती पार्थ पवार यांनी विकत घेतली असा हा व्यवहार आहे.पार्थ पवार यांच्या कंपनीने विकत घेतलेली ही जमीन महार वतनी आहे. आणि अशा जमिनी विकत घेता येत नाहीत किंवा घ्यायच्या असतील तर त्याचे काही वेगळे नियम आहेत.

या प्रकरणात हे नियम पाळले गेले आहेत का? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र म्हणून शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांना कृपादृष्टी दाखवली आहे का? मुद्रांक शुल्क(Water) बुडवले आहे का? कोणत्या अधिकारात या अधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीशी हा व्यवहार केला? जमिनीची किंमत कोणी ठरवली? त्यासाठी कोणते निकष लावण्यात आले? असे काही प्रश्न या निमित्ताने पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रकरणात लक्ष घातले आहे आणि त्यांच्या मते यामध्ये भ्रष्ट व्यवहार झालेला आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अंजली दमानिया या दिनांक अकरा रोजी याच प्रकरणावर भेटणार आहेत आणि या व्यवहारात कशी अनियमितता झाली आहे याचे पुरावे त्या सादर करणार आहेत. जमिनीचा इतका मोठा व्यवहार होत असताना तो महसूलमंत्र्यांना माहीत नसावा याचे आश्चर्य वाटते.माझ्यापर्यंत याप्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे मला हा व्यवहार नेमका माहिती नाही. आता अंजली दमानिया यांच्यामुळे तो मला समजेल अशी भूमिका महसूलमंत्र्यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे सर्व प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलेले आहे. या जमीन खरेदी विक्री प्रकरणात प्रथमदर्शनी जे मुद्दे पुढे आलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत. त्याची चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे फडणवीस यांनी मीडियासमोर बोलताना स्पष्ट केले आहे.2014 ते 2019 यादरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. त्यांनी पुणे औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात असलेली काही जमीन अशाच प्रकारेआपल्या जावयासाठी खरेदी केली होती. सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवून हा व्यवहार झाला होता आणि तो एकनाथ खडसे यांच्या दबावातून झाला होता हे सकृत दर्शनी स्पष्ट झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्याकडून महसूल खाते काढून घेतले होते. नंतर या प्रकरणाची चौकशी लावली होती. या चौकशीत या जमीन खरेदी व्यवहारात नियमितता आढळून आली होती. शासनाने हा व्यवहार रद्द केला होता. आता काहीसा असाच प्रकार घडलेला आहे आणि त्यात अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सापडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या संदर्भात जो न्याय लावला होता तोच न्याय पार्थ पवार यांना लावला जाणार आहे का?

चरितार्थाचे कायमस्वरूपी साधन म्हणून पूर्वी महार समाजाला शेतजमिनी दिल्या गेल्या होत्या. या जमिनी त्यांच्याकडेच राहिल्या पाहिजेत म्हणून त्या इतर कुणालाही खरेदी करता येणार नाहीत असा एक नियम होता आणि आजही आहे. असा नियमअसताना चाळीस एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला कोणत्या आधारे दिली? या जमिनीवर ते कोणता उद्योग उभारणार होते? हेआता चौकशीतून पुढे येईल या प्रश्नांची उत्तरेही सर्व सामान्य जनतेसमोर येतील.पार्थ पवार हे फार मोठे उद्योजक आहेत अशी त्यांची ओळख नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ते पुत्र आहेत आणि त्यांनी एकदा लोकसभेची निवडणूक लढवली होती इतकीच त्यांच्याबद्दल माहिती आहे.शरद पवार यांनी तेव्हा त्यांची हक्काची लोकसभेची जागा पार्थ पवार साठी सोडली होती. पण पार्थ पवार यांना ही निवडणूक जिंकता आली नाही.पार्थ पवार यांच्या कंपनीवर शासन मेहरबान झाले. गरीबशेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या कंपनीला दिल्या. आता मात्र हा व्यवहार पुढे आल्यानंतर जमिनीचे मूळ मालक असलेले शेतकरीआमच्या जमिनी आम्हाला परत करा अशी मागणी करू लागले आहेत. त्यांची मागणी चूक आहे असे कोणीही म्हणणार नाही.

पार्थ पवार हेअजितदादा यांचे पुत्र आहेत आणि म्हणूनच हा व्यवहार झाला आहे एवढे मात्र निश्चित. हा व्यवहार आपणाला माहिती नाहीअसा खुलासा अजितदादा पवार यांनी केला तर त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.या खळबळजनक प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया मात्र पार्थ पवार यांचा बचाव करणारी आहे. हे जमीन खरेदी प्रकरण अन्य कुणी केले असते तर याच सुप्रिया सुळे यांनी आकांडतांडव केले असते. अजित दादा पवार यांनी मात्र या प्रकरणाशी माझा दुरांन्वयानेही संबंधनसल्याचे सांगताना दोन-तीन महिन्यापूर्वी असे काहीतरी मला घरी कानावर पडले होते तेव्हा मी स्पष्ट शब्दात असे काही चालणार नाही अशी समज दिली होती असा खुलासा केला आहे. पण त्याचबरोबर मुले सज्ञान झाली की त्यांना स्वतंत्रपणे काही व्यवहार करण्याचा अधिकार असतो हे सांगायला सुद्धा ते विसरलेले नाहीत.या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

हेही वाचा :

विकी कौशल झाला बाबा; कॅटरीनाने दिला गोंडस मुलाला जन्म
थांब मी आता तुला दाखवतो… रोहित शर्माला राग अनावर
ओव्याचे की जिऱ्याचे पाणी…वजन झपाट्याने कमी करण्यासाठी दोघांपैकी कोणते ठरेल फायदेशीर