सर्वसामान्य जनता आणि कर्जदारांसाठी(borrowers) मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या नागरिकांसाठी ईएमआय कमी होऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले आहेत की सध्याचे आर्थिक निर्देशांक आणि महागाईच्या घटलेल्या दरांमुळे रेपो दरात कपात होण्याची मोठी संधी आहे.

पुढील महिन्यात, ३ ते ५ डिसेंबर दरम्यान, RBIच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. याआधी गव्हर्नर मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, दरात कपात करायची की नाही, हे अंतिम निर्णय MPCच्या बैठकीत घेतला जाईल. ऑक्टोबरच्या बैठकीतच दरांमध्ये कपातीचे संकेत देण्यात आले होते, त्यामुळे डिसेंबरमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी ते जूनदरम्यान MPCने सुमारे १०० बेसिस पॉइंटने दर कमी केले होते, पण ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये रेपो दर ५.५% वर स्थिर ठेवला गेला होता.

दरात कपात होण्यामागे मुख्य कारण म्हणजे(borrowers) महागाईत घट. ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई ०.२५% वर आली, जी सप्टेंबरमध्ये १.४४% होती. तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरच्या बैठकीत २५ बेसिस पॉइंटपर्यंत (०.२५%) दरात कपात होण्याची शक्यता आहे. गव्हर्नर मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, RBIचे पहिले उद्दिष्ट महागाई नियंत्रण ठेवणे आणि दुसरे उद्दिष्ट आर्थिक विकासाला समर्थन देणे आहे. त्यामुळे बँका ना तर जास्त आक्रमकपणे दर कमी करतील, ना पूर्णपणे बचावात्मक भूमिका घेतील.

रुपयाच्या चलनवाढीबाबत विचारले असता, गव्हर्नर म्हणाले की ऐतिहासिकदृष्ट्या रुपयाचे मूल्य दरवर्षी सुमारे ३ ते ३.५% ने कमी होते, आणि RBIचे उद्दिष्ट आहे की विनिमय दरातील अचानक बदलांमुळे आर्थिक अस्थिरता होऊ नये.

हेही वाचा :

जर तुमच्या घरातून एलपीजीचा वास येत असेल तर या चुका अजिबात करू नका
Amazon, Flipkart नव्हे, ‘या’ वेबसाईटवर Free मिळतोय गुगलचा जबदरस्त स्मार्टफोन
टीम इंडियावर मोठं संकट! हातात फक्त एकच संधी शिल्लक