राष्ट्र गान ‘जन गण मन’ प्रमाणे आता राष्ट्र गीत ‘वंदे मातरम्’ सुद्धा सरकारी (national) कार्यक्रमात वाजवणं आणि गाणं अनिवार्य केलं आहे. राष्ट्रगीत वंदे मातरम आणि राष्ट्रगान जन गण मन एकत्र गायलं किंवा वाजवलं जात असेल तर वंदे मातरम् पहिलं वाजवलं जाईल. इतकच नाही, तर गायन आणि वादनाच्या वेळी श्रोत्यांना सावधन मुद्रेतच उभं रहावं लागेल. सहाकडवी असलेल्या 3 मिनिट 10 सेकंदांच्या वंदे मातरम् चे गायन करावे लागणार आहे. याआधी वंदे मातरम् ची दोन कडवी गायली जात होती. तिरंगा फडकवताना, सरकारी कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या आगमनावेळी, त्यांच्या भाषणावेळी, देशाला संबोधित करण्याच्या आधी आणि नंतर. सोबतच राज्यपालांच आगमन आणि त्यांच्या भाषणाआधी आणि नंतर, वंदे मातरम् संबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्देश दिले आहेत.

न्यूज रील किंवा डॉक्यूमेंट्री दरम्यान राष्ट्र गीत कुठल्या चित्रपटाचा (national) भाग म्हणून दाखवलं जात असेल तर प्रेक्षकांकडून उभं राहण्याची अपेक्षा नसेल. कारण प्रेक्षक उभे राहिल्यास फिल्मच्या प्रदर्शनात बाधा येईल तसचं राष्ट्रगीताचा मान वाढण्याऐवजी अव्यवस्था आणि भ्रम अशी स्थिती निर्माण होईल.हे निर्देश इंग्रजी आणि हिंदीमध्ये सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात, मंत्रालय तसेच संवैधानिक संस्थांमध्ये जारी करण्यात आले आहेत.
आतापर्यंत ‘वंदे मातरम्’च्या गायना दरम्यान कुठलाही अधिकृत प्रोटोकॉल नव्हता. (national)पण ‘जन गण मन’साठी स्पष्ट नियम होते. सहाकडव्यांचं‘वंदे मातरम्’ अजूनपर्यंत अधिकृत कार्यक्रमात गाण्यात आलेलं नाही. पण आता हे अनिवार्य केलं आहे. राष्ट्रगीत कुठल्या-कुठल्या प्रसंगात गायचं किंवा वाजवायचं त्या कार्यक्रमांचं तीन कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे.नव्या व्यवस्थेतंर्गत राष्ट्र गीत बँडद्वारे वाजवलं जात असेल, तर त्याआधी ढोल थाप ड्रम रोल दिला जाईल. जेणेकरुन श्रोत्यांना संकेत मिळेल की राष्ट्रगीत वाजवलं जाणार आहे.
आदेशानुसार, सर्व शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्र गीताच्या सामूहिक (national)गायनाने करता येऊ शकते. तसचं विद्यालय व्यवस्थापनाने राष्ट्र गीत आणि राष्ट्र गान लोकप्रिय करण्यासाठी तसच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय ध्वजाप्रती सन्मानाची भावना विकसित करण्यासाठी पर्याप्त व्यवस्था करावी. औपचारिक नसलेल्या प्रसंगी सुद्धा तुम्ही राष्ट्र गीत गाऊ शकता. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ 150 वर्ष साजरी केली जात आहेत.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटीEdit