पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याने (Yojana)वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना (Yojana) प्रत्येक वर्षाला 6000 रुपयांचा आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात.
या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायवयाचा असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर जातात. त्यामुळेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड-बँक खाते लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही.
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीशीं सबंधित सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे गरजेचे आहे. तसेच या कागदपत्रांची सरकार दरबारी नोंद असणेही गरजेचे आहे. कागदपत्रांची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.
हेही वाचा :
श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!
‘जिद्द ना सोडली’, योगिता मानेने बस चालवत रचला इतिहास;
श्रीमंतांनी टाकलेल्या जुन्या पुराण्या वस्तू विकून श्रीमंत झाली महिला,