एकावेळी ताटात किती चपात्या वाढाव्यात? 3 चपात्या वाढल्याने तर…

हिंदू धर्मात जेवताना अनेक नियमांचे पालन केले जाते. त्यातील एक नियम म्हणजे एकावेळी ताटात 3 चपात्या न वाढणे.(added ) यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्हीही कारणं आहेत.हिंदू धर्मात 3 हा अंक अशुभ मानला जातो. अनेक पूजा-विधींमध्ये 3 हा आकडा टाळला जातो. त्यामुळे ताटात कधीही तीन चपात्या, भाकऱ्या वाढू नये असे सांगितले जाते.जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या तेराव्याच्या विधीपूर्वी, मृत व्यक्तीच्या नावाने ठेवलेल्या ताटात 3 चपात्या वाढल्या जातात. त्यामुळे 3 चपात्या वाढणे हे मृत व्यक्तीसाठी जेवण मानले जाते आणि ते वर्ज्य आहे.


.
काही मान्यतेनुसार, जर एखादी व्यक्ती एकाच वेळी 3 चपात्या घेऊन जेवत असेल, तर त्याच्या मनात दुसऱ्यांसोबत वाद-विवाद करण्याची भावना उत्पन्न होते असे मानले जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकाच वेळी जास्त अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. (added )त्यामुळे थोडे-थोडे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. विज्ञानानुसार, एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी एक वाटी आमटी, एक वाटी भाजी, ५० ग्रॅम भात आणि दोन चपात्या इतका आहार पुरेसा असतो.

जर शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्रिदेवांपैकी ब्रह्मा, विष्णू, महेश महेश अर्थात भगवान शंकर हे संहारक मानले जातात.(added ) त्यामुळे 3 या अंकास काही प्रमाणात अशुभतेशी जोडले जाते.ही प्रथा वर्षानुवर्षे पाळली जात असल्याने, अनेक घरांमध्ये आजही या नियमाचे पालन केले जाते. या सर्व कारणांमुळे, जेवणाच्या ताटात एकाच वेळी 3 चपात्या किंवा भाकऱ्या वाढण्याची सवय पूर्णपणे टाळली जाते.

हेही वाचा :