अनेकदा आयुष्यात आपण अशा टप्प्यावर येतो, जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं न घडल्याने आपण निराश होतो आणि सर्व काही नशिबावर(luck) सोडून देतो. मात्र, नशिब बदलण्याआधी विश्व आपल्याला काही संकेत देतं — जे आपण ओळखू शकलो, तर चांगले दिवस जवळ येत असल्याचा अंदाज आपल्याला अगोदरच येऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल होणार असतात तेव्हा काही विशेष गोष्टी घडतात. त्यातील पहिला संकेत म्हणजे स्वप्नात मंत्र ऐकणे — जर तुम्हाला स्वप्नात “राम राम”, “ओम” किंवा गायत्री मंत्रासारखे पवित्र शब्द ऐकू आले, तर ते दैवी कृपेचे लक्षण आहे. दुसरा संकेत म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर आपोआप जाग येणे — पहाटे ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान उठणे हे आध्यात्मिक जागृती आणि शुभ परिवर्तनाचे चिन्ह मानले जाते.
तिसरा संकेत म्हणजे शरीराचे अवयव फडफडणे — पुरुषांमध्ये उजव्या बाजूचा आणि महिलांमध्ये डाव्या बाजूचा अवयव फडफडणे हे शुभ मानले जाते. हे जीवनात सकारात्मक उर्जा आणि यश येत असल्याचे दर्शवते. चौथा आणि शेवटचा संकेत म्हणजे घरातील आनंदी वातावरण — घरातील झाडं बहरणं, सतत दिवा पेटलेला राहणं, किंवा कुटुंबात हसतं-खेळतं वातावरण असणं हे सर्व आनंद आणि समृद्धीचे द्योतक आहे.

म्हणून, जर हे संकेत तुम्हालाही जाणवले तर नशिब(luck) बदलण्याच्या मार्गावर तुम्ही आहात, असा विश्वास बाळगा. या काळात देवाचे स्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा आणि चांगल्या दिवसांचे स्वागत करण्यास तयार राहा.
हेही वाचा :
शिंदे गटाला मोठा हादरा, ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार…
उद्धव ठाकरे गटाचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार
सोने 3500, तर चांदी 4 हजार रुपयांनी उतरली…