राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट!

मुंबई, कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.(dangerous)गेले काही दिवस मुसळधार सरी कोसळत असताना, हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषत: कोकण, मुंबई, ठाणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे. मुंबईत रविवारी दुपारी आणि आज सकाळपासूनही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळीपासून अंधेरी सबवे मध्ये २ ते ३ फूट पाणी साचले असून, वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने बॅरिकेट्स लावून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पाणी उपसण्यासाठी पंप आणि जीवरक्षक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

कमाल तापमान: 31°C
किमान तापमान: 26°C

अलर्ट: यलो अलर्ट
ठाणे व नवी मुंबईमध्ये रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासून वातावरण ढगाळ आणि दमट असून, हलक्या सरींचा पुनरावृत्तीचा अंदाज आहे.

ठाणे/नवी मुंबई तापमान:
कमाल: 30°C
किमान: 25°C

पालघर जिल्ह्यात थोडी विश्रांती, पण उकाडा वाढणार :
पालघरमध्ये पावसाचा जोर थोडासा ओसरला असला तरी(dangerous) ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवते. कृषी कार्यांवर याचा परिणाम होऊ शकतो.

कमाल तापमान: 29°C
किमान तापमान: 24°C

कोकणात मच्छिमारांना अलर्ट! समुद्र खवळलेला :
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मागील दोन (dangerous)दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. आजही यलो अलर्ट कायम असून, जोरदार सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तापमान: कमाल – 30°C, किमान – 25°C
सागरी इशारा: समुद्र खवळलेला, मच्छिमारांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.

हेही वाचा :

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, तीन दिवसात तिसऱ्या खेळाडूला दुखापत, स्टार खेळाडू संपूर्ण सीरिजमधून बाहेर

कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर

‘लग्नात अक्षतांऐवजी वाटल्या झाडांच्या बिया’; उंडाळ्यात पाटील कुटुंबीयांचा उपक्रम, पर्यावरण संवर्धनाचा संदेश