शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता(vitamin b12) भरून काढण्यासाठी आहारात डाळिंब किंवा बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. पण शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. (vitamin b12)शरीरात थकवा निर्माण होणे, अशक्तपणा, सतत तोंड येणे, हाडांमधील वेदना इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात. धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांमुळे शरीरात सतत तणाव वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ पेयांचे करा सेवन:

गाजर बीटचा रस:
गाजर बीटचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर बीट गाजरचा रस प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर पडून जातील. रक्तातील पोषण द्रव्यात भर पडण्यासाठी गाजर बीटचे सेवन करावे. गाजरमध्ये फॉलिक ऍसिड, फायबर आणि जीवनसत्त्व अ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय बीटमध्ये लोह आणि इतर खनिजे मोठ्या प्रमाणवर आढळून येतात. हा रस उपाशी पोटी घेतल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळतात.

लिंबू आल्याचा रस:
लिंबूमध्ये असलेले विटामिन सी शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरते. याशिवाय आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, कमी करण्यासाठी लिंबू आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. टोपात पाणी आणि आल्याचा किस टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून सेवन करावे. या पाण्याचे सेवन प्रामुख्याने सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर करावे.

डाळिंबाचा रस:
डाळिंबामध्ये लोह आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे रक्तनिर्मितीस चालना मिळते. शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे. या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतील. विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यास डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे.

हेही वाचा :

काळी दिसते, म्हणून पत्नीला कपडे काढायला लावले, मग तिच्या शरीरावर…
विराट कोहलीच्या फिटनेस टेस्टबाबत मोठी अपडेट
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय कराल? आवश्यक कागदपत्रं व पद्धत..