लातूर – सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री खळबळजनक घटना समोर आली आहे. शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्या(worker) अनमोल केवटे यांच्या कारला सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीपने कट मारल्यानंतर वादावादीत अनमोलचा जीव गेला आहे. यामध्ये क्रुझर चालकाने अनमोल याचा गळा चिरून हत्या केली तर सोनाली हिच्या पाठीत आणि पोटात भोसकले. या गुन्हेगारांनी अनमोलवर प्राणघात हल्ला केला. या हल्ल्यात अनमोलचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनमोलसोबत असलेल्या सोनाली भोसले या वाचविण्यासाठी गेल्या असता त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

लातूर मेळाव्यासाठी सोनाली आणि अनमोल गेले असताना बुधवारी रात्री ही भयानक घटना घडली. सोनाली या विवाहित असून त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी शुभम पतंगे, वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी विष्णू मामडगे ज्या जीपने कट मारला त्या क्रुझर जीपचा तो मालक आहे. तसंच तो पोलिसांना तपासात गुन्हेगारी वृत्ती असल्याचा समोर आलं आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोधात आहे.

बुधवारी रात्री लातूरहून सोलापूरकडे जाताना खाडगाव स्मशानभूमीजवळ भरधाव जीप कट मारून पुढे गेली. त्यावेळी कट बसला नाही, पण गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे अनमोल केवटे यांनी त्याला गाडी नीट चालवता येत नाही का, असे म्हटले. त्यानंतर तो पुढे गेला आणि जीप आमच्या कारच्या समोर आडवी लावली. त्यावेळी परिस्थितीचा अंदाज मला आला होता. आपण गाडी मागे घेऊन निघून जाऊ, कशाला उगीचच वाद घालायचा. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. समोरच्या जीपमधून ती माणसं खाली उतरली. त्यावेळी दोघेही खाली उतरले आणि त्यांच्यात आधी बाचाबाची झाली. काही कळायच्या आतच समोरच्याने हत्यार काढले आणि केवटे यांना भोसकले. त्याच व्यक्तीने महिलेवरही वार केले, कार रिव्हर्स घेण्याची माझी इच्छा होती, केवटे यांनी ऐकले असते तर हा प्रकार टाळता आला असता, अशा शब्दात कारचालकाने आपली प्रतिक्रिया दिल्याची माहिती पुढे आली आहे.
मृत अनमोल केवटे हा मूळ गाव मंद्रुप, जि. सोलापूरचा होता. अनमोल केवटे हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ता असल्याचे सांगत असे. तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता. शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबत अनमोल केवटे याचे सोशल मीडियावर फोटो आहेत. अनमोल केवटे यावर देखील सोलापूरच्या विविध पोलीस ठाण्यात पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मारामारी, खंडणी वसुली यासारखे गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं.

अनमोल केवटे हा माहिती अधिकार कार्यकर्ता(worker) म्हणून काम करीत असला, तरी अनेकांना त्याने त्रास दिल्याची चर्चा आहे. अनेक शिक्षण संस्था, शिक्षक, शासकीय कर्मचारी, पोलीस यांच्या विरोधात माहिती अधिकाराच्या माध्यमातून शेकडो तक्रारी दिल्या होत्या. त्याच्या विरोधात शहरात तसेच मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. खंडणी, मारामारी, दरोडा, दारू पिऊन गोंधळ घालणे अशा गुन्ह्यांमुळे त्याला पोलिसांनी तडीपार केले होते. परंतु तरीही तो बिनधास्तपणे सोलापुरात फिरत असल्याचे बोलले जाते. एकीकडे अनमोलचा खून झाल्याने खळबळ माजली असतानाच दुसरीकडे त्याने दिलेल्या त्रासामुळे वैतागलेल्या अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडल्याची चर्चा मंद्रुप परिसरात सुरू आहे.
लातूर-सोलापूर महामार्गावर बुधवारी, 17 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री खाडगाव स्मशानभूमीजवळ किरकोळ वादातून अनमोल केवटे (वय 37, रा. मंद्रुप, जि. सोलापूर) याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्यासोबत असलेली मैत्रीण सोनाली सुखदेव भोसले (वय 27) गंभीर जखमी झाली. हल्लेखोरांनी क्रुझर जीप आडवी लावून वाद सुरू केला आणि धारदार शस्त्राने हल्ला केला.
अनमोल आणि सोनाली हे लातूरमधील भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानंतर सोलापूरकडे परत जात होते. मध्यरात्री 12:45 वाजता क्रुझर जीपने कारला कट मारला. वाद वाढल्यावर हल्लेखोरांनी अनमोलचा गळा चिरला आणि सोनालीच्या पाठीत व पोटात वार केले. अनमोलचा जागीच मृत्यू झाला, तर सोनालीला सोलापूरमधील रुग्णालयात दाखल केले गेले.
हल्लेखोर हे रेणापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मुख्य आरोपी विष्णू मामडगे (क्रुझर जीपचा मालक) फरार आहे. पोलिसांनी शुभम पतंगे आणि वैभव स्वामी यांना अटक केली असून, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विष्णू मामडगे गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी 4 टक्के व्याजदरावर 5 लाख रुपयांचे कर्ज…
डीमार्टपेक्षा जास्त स्वस्त सामान कुठं मिळतं?
बळजबरी तरूणीच्या खोलीत घुसला अन् ……