संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्या उन्हाच्या तीव्र झळा आणि कोकण पट्ट्यातील (schedule) दमट हवामानामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. अशातच सर्वांचे लक्ष अंदमानच्या समुद्रातील मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. भारतीय हवामान विभागाने १४ ते २० मे दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज दिला असला तरी, एका खासगी हवामान संस्थेने यंदा पावसाचे आगमन लवकर होण्याची शक्यता वर्तवली आहे.स्कायमेट या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा मान्सून आपल्या नेहमीच्या वेळेआधीच धडक मारू शकतो. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या १४ ते २० तारखेच्या काळात या उपसागरात नैऋत्येकडून वारे वाहण्यास सुरुवात होईल. याच आठवड्यात अंदमान आणि निकोबार बेटांवर तसेच उपसागराच्या दक्षिण भागात पावसाची सुरुवात होईल.

१२ आणि १३ मे रोजी विषुववृत्ताजवळ उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात (schedule) एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे, जे दक्षिण श्रीलंका, मालदीव आणि कोमोरिन परिसरात जास्त सक्रिय असेल.या नव्या हवामान प्रणालीमुळे पूर्व-पश्चिम दिशेने एक मोठा द्रोणीय पट्टा तयार झाला आहे. याचा थेट प्रभाव आग्नेय अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भागांवर पडताना दिसेल. सर्वसाधारणपणे २० मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानात पोहोचतो आणि त्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजे २२ मे रोजी तो उत्तर अंदमान, पोर्ट ब्लेअर आणि माया बंदर भागात व्यापतो. परंतु, यावर्षी १२-१३ मे दरम्यान तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल, ज्यामुळे पाऊस लवकर येण्यास मदत होईल.
राज्यात उन्हाचा कहर आणि अवकाळी पावसाचा तडाखा एकीकडे पावसाची (schedule) प्रतीक्षा असताना, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढल्याने नागरिकांना वैशाखाच्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त उकाडा जाणवत असल्याची तक्रार लोक करत आहेत. शनिवारी राममंदिर परिसरात ३९ अंश, तर विक्रोळीत ३८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तसेच कुलाबा येथे ३४.४ अंश आणि सांताक्रूझ येथे सरासरीपेक्षा दोन अंश अधिक म्हणजेच ३५.६ अंश तापमानाची नोंद झाली.
रायगड जिल्ह्यातही पारा ३९ अंशांवर गेला होता; मात्र तिथे सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला. या दरम्यान अंगावर वीज कोसळल्याने एका चौदा वर्षांच्या कोवळ्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला.मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये उष्णतेची लाट अधिकच तीव्र होती. अनेक स्वयंचलित हवामान केंद्रांनी कमाल तापमान ४० अंशांच्या वर गेल्याचे दर्शवले. पालघरमधील सुकसाळे येथे सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याव्यतिरिक्त पलावा येथे ४३.६ अंश, नेरळ येथे ४३.५ अंश, आणि अंबरनाथमध्ये ४३.४ अंश तापमान होते. तसेच कल्याण ४३.१ अंश आणि डोंबिवली येथे ४२.८ अंशांवर पारा पोहोचला होता. नवी मुंबई परिसरामध्येही तापमानाचा काटा ४० अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांची मोठी घालमेल झाली.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?