कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

गाण्याची मैफल असते. तिथे गायकाला गाण्याचा सूर पकडण्यासाठी आधी गळा मोकळा करावा लागतो.(spectacle)घशात स्वर भिजवावे लागतात. तमाशाचा फड असतो. तिथे नांदी, गणगवळण, बतावणी आणि मग वगनाट्य असते. राजकारणात बिन पैशाचा तमाशा असतो. आणि आरोप प्रत्यारोपाचा फड असतो. त्यात”बाई”ची एन्ट्री झाली की फडाची रंगत वाढते. सध्या गौतमी पाटील हिच्या गाडीच्या अपघातावरून मंत्री आणि आमदार यांच्यात वाजाचा फड असाच रंगला आहे. “गौतमीला उचलायची नाही का?”हे प्रश्नांकित वाक्य”बाई वाड्यावर चला”या वाक्यात इतकेच सध्या गाजू लागले आहे.साधा अपघात, गंभीर अपघात, आणि मृत्यूस कारण ठरलेला अपघात असे वाहन अपघाताचे तीन प्रकार आहेत. साधारण अपघात झाला की त्याची नोंद मोटर वाहन अपघात कायद्याखाली घेतली जाते.

अपघातात माणूस दगावला असेल तर त्याला” फेटल”असेही म्हटले जाते. त्याची नोंद भारतीय न्याय संहितेखाली केली जाते. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. दोन-चार दिवसांपूर्वी पुण्यातील एका भागात एका भरदार कार ने ऑटो रिक्षाला धडक दिली. रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. (spectacle)एरव्ही एक नित्याची घटना अशीच दखल या अपघाताची घेतली गेली असती. पण ही कार गौतमी पाटील हिची असल्याचे स्पष्ट झाल्यावर या अपघाताचे मीडियाने गांभीर्य वाढवले.अपघातग्रस्त कारमध्ये गौतमी पाटील होती. कुणी एक वरिष्ठ अधिकारीही तिच्यासोबत होता. गौतमीच कार चालवत होती. आता काय चालक म्हणून दुसराच कोणी उभा केला आहे. अशा आशयाच्या बातम्या मीडियातून झळकल्या.

जखमी रिक्षा चालकावर एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात विचार सुरू आहेत.या अपघाताची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतलेली नाही. गौतमी पाटील हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी तक्रार घेऊन संबंधित जखमी रिक्षा चालकाची मुलगी पुणे येथे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटली. (spectacle)त्यांनी मत सरळ संबंधित पोलीस अधिकाऱ्याला फोन केला.”गौतमी पाटील हिला उचलली नाही का?”अशी विचारणा त्यांनी केली. त्यांचे हे संभाषण व्हायरल झाले. आणि त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात वादाचा फड चांगलाच रंगला.

गौतमीला उचलायची नाही का? या एका वाक्यावर रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर चंद्रकांत दादा यांनी दबाव आणला आहे आणि तो योग्य नाही असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे.(spectacle) रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार झाले पाहिजेत, त्याच्या उपचाराचा खर्च अपघातग्रस्त कारच्या मालकांनी केला पाहिजे, कार कोण चालवत होते? गौतमी पाटील ह्या कार चालवत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण उचलण्याची भाषा मंत्री महोदयांना शोभत नाही असे रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटल्यानंतर चंद्रकांत दादा यांनीही त्यांच्यावर पलटवार सुरू केला. गृह विभाग माझ्याकडे नाही आहे. पण माझ्याकडे कोणी एखादी तक्रार घेऊन आले असेल तर त्याची मी दखल घ्यायची नाही का? रिक्षा चालकाची मुलगी माझ्याकडे आली होती तिने तक्रार केली होती म्हणून मी फोन केला.

तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन प्रत्यक्ष पोलिसांना धमक्या देता तशा धमक्या मी काही दिल्या नाहीत किंवा देतही नाही अशा शब्दात चंद्रकांत दादांनी रोहित पवार यांना फटकारले.(spectacle)या दोघांचा वादाचा फड रंगात आलेला असताना गौतमी पाटील हिने मात्र त्याची दखल घेतलेली नाही. किंवा त्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही. या अपघात प्रकरणी पुणे पोलीस जी घ्यायची तशी दखल घेतील.दुसऱ्या एखाद्या कारचालकाकडून अशा प्रकारचा अपघात झाला असता तर या दोघांनीही त्याची दखल घेतली असती का? केवळ या अपघातामध्ये गौतमी पाटील हिचे नाव आल्यामुळे वादही रंगला आणि अपघातही गाजला.”बाई वाड्यावर चला” या वाक्याऐवजी आता”उचलायची नाही का?”हे वाक्य बोलले जाईल यात शंका नाही.

हेही वाचा :

 दुर्लक्ष न करता घ्या काळजी….

Renault Triber ची चावी तुमच्या हातात,

आजची आश्विन पौर्णिमा राशींसाठी भाग्याची! लक्ष्मी-गणेशाची मोठी कृपा,