नागपुरात ‘गुलाबजाम’वरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले. मित्राने चाकूने हल्ला केल्याने कॅटरर्स कामगाराचा मृत्यू झाला. शांतीनगर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला.

नागपूरमधुन एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच मित्रावर चाकू भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा हल्ला गुलाब जामून देणाऱ्या कॅटरर्स कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना शांति नगर पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव आयुष्य आयुष चेतनानंद मेश्राम, बादल शेंडे आणि अक्षय नागपुरे असे आहे. बादल आणि अक्षय ९ मे रोजी रात्री कामावरून परतताना त्याला एका ओळखीच्या मित्रांनी मस्करीत विचारले की, ‘गुलाबजाम’ आणले असतील, तर मला दोन खायला दे’, म्हणत त्याची खिल्ली उडवली. (Nagpur) त्यावर प्रत्युत्तर म्हणून आरोपीने अख्तरला शिवीगाळ केली. थोड्या वेळानंतर, ते आयुष मेश्रामसह आले, नंतर शिवीगाळ करणे सुरुच ठेवले, नंतर त्यांनी अख्तरला नेमकं काय म्हणाला? असा प्रश्न करून जाब विचारला. पुढे त्याने अख्तरने स्पष्ट केले की, केवळ गुलाबजाम मागितले होते, हे ऐकताच आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्या मांडीवर मोठ्या जखमा झाल्या होत्या.
सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्यया घटनेनंतर पीडित तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.(Nagpur) मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. या किरकोळ कारणावरून वाद झाल्याने आता सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरात अमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी नागपूर पोलीस दलाने मोठी कारवाई करत विविध ठिकाणी छापेमारी केली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी या अत्यंत घातक आणि महागड्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. (Nagpur) या नव्या प्रकारच्या ड्रग्सचा नागपुरात शिरकाव झाल्याने पोलीस प्रशासनासह पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत
देवेंद्र फडणवीस यांचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सर्वच मंत्री हालचाली वाढल्या!
रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?